शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

धामणगावचे तीन हजार वारकरी विठ्ठलाच्या दारी

By admin | Updated: July 27, 2015 00:27 IST

गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचा उभा टिळा व हातात टाळ घेऊन तालुक्यातील तीन हजार वारकरी रविवारी पहाटे विठ्ठलाच्या दारी वैकुंठात पोहोचले आहेत.

आषाढी एकादशी : ४० वर्षांपासूनची वारीची परंपरा धामणगाव (रेल्वे) : गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचा उभा टिळा व हातात टाळ घेऊन तालुक्यातील तीन हजार वारकरी रविवारी पहाटे विठ्ठलाच्या दारी वैकुंठात पोहोचले आहेत. मागील चाळीस वर्षाच्या वारीची परंपरा आजही तालुक्यात कायम आहे़धामणगाव तालुका शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रक्रमावर आहे़ तालुक्यात ३७० पुरूष तर २४२ महिला भजनी मंडळे आहेत़ वारकरी संप्रदायही मोठ्या प्रमाणात रूक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथील पालखी सोहळ्यात तालुक्यातील वारकरी दरवर्षी सहभागी होतात़ तर सहा दिवसांपासून विविध बस, रेल्वेने प्रवास करीत पंढरपुरात हे वारकरी पोहोचतात़ पंढरीची वारी ही आपल्या जिवनातील निष्ठा आहे़ असा मनी भाव ठेवून तालुक्यातील वारकरी वारीची अनुभूती घेतात़ तालुक्यातील निंभोरा बोडका येथील रामदास डुबे यांनी वारीला जाण्याची सुरूवात चाळीस वर्षापूर्वी केली होती़ आज त्या गावातील ७५ युवक वैकुंठात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात़ अशोकनगर येथील विठ्ठल राजणकर हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात़ दरवर्षी विठ्ठल रूक्मिणी भजनीमंडळाच्या माध्यमातून ५० महिला-पुरूष पंढरपूरला जातात. वारीची परंपरा देवगाव, तळेगाव दशासर, विरूळ रोंघे, जळगाव आर्वी, जुना धामणगाव, अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, निंभोरा राज, भातकुली, या गावात आहे़ येथील वृध्द पुरूषच नव्हेतर नवयुवकांनी वारीची पताका आपल्या हातात यावर्षीपासून घेतली आहे़ (तालुका प्रतिनिधी)