शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

तीन लाख शेतकरी कर्जमुक्त

By admin | Updated: June 13, 2017 00:01 IST

शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, याचा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतकरी आंदोलनाचे यश : पाच एकरांवरील दीड लाख खातेदार प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, याचा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र कमाल भूधारकांसाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. कर्जमाफीविषयीचे निकष समिती ठरविणार असल्याने महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. या सर्व खातेदारांना आजपासूनच कर्ज वाटपाचे आदेश शासनाने दिल्याने आता कर्ज वाटपाचा टक्का वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे हे फलित होय.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यात उसळलेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकामुळे अखेर शासनाने नमते घेतले व अल्प भूधारकांना रविवारी कर्जमाफी दिली. या सर्व शेतकऱ्यांना सोमवारपासून कर्ज देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र जिल्ह्यातील बँकांनी अद्याप थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज दिलेले नाही. घोषणा जरी शासनाने केली असली तरी प्रत्यक्षात बँकांना याविषयीचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे एक, दोन दिवसांत बँकांव्दारा कर्जवाटप सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी मंगळवारी कर्ज वाटपविषयक सर्व यंत्रणांची बैठक बोल्यावली आहे. यामध्ये शासनाचे सूचना देण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने पीककर्ज वाटपाचा वेग वाढणार आहे. जिल्ह्यात पाच एकरांच्या आतील ३ लाख ८ हजार ४६४ शेतकरी खातेदार आहेत. पैकी किमान अडीच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ होणार आहे. संयुक्त समितीच्या निर्णयाची प्रतीक्षाअमरावती : जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ३११ शेतकऱ्यांकडे पाच एकराच्या वर शेती आहे. यापैकी ६ एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी निकष काय असावेत यासाठी सुकाणू समिती व शासनाचे सदस्य यांची संयुक्त समितीमध्ये बैठका होतील. त्यानंतर हा मुद्दा निकाली निघणार आहे. तोवर दीड लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात ३.३३ लाख शेतकरी कर्जदारजिल्ह्यात ४.१५ लाख शेतकरी खातेदार आहेत. यापैकी तीन लाख ३३ हजार १९७ शेतकरी कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ३६,८३३, राष्टीयीकृत बँकेचे २,३८,०२१ व ग्रामीण बँकेचे १,९८४ शेतकरी कर्जदार आहेत. अद्याप ६५,२७८ शेतकऱ्यांनी कर्जाचा लाभ घेतला नाही तर १,७५७ शेतकरी खातेदारच नाहीत. मागील वर्षी १,६५,७७१ शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज घेतले आहे. जिल्ह्यात १,६७,४२६ शेतकरी विवीध बँकांचे थकबाकीदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ३६,८८३, राष्टीयकृत बँकेचे १,३१,००१, तर ग्रामीण बँकेचे ५०२ शेतकरी थकबाकीदार आहेतयंदा १,३५४ कोटींचे कर्जवाटप बाकीयंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना १,५९२ कोटी ५४ लाखांचे पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक आहे त्या तुलनेत सद्यस्थितीत बँकांनी १,३५४ कोटी ५२ लाक रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राष्टीयीकृत बँकांना १,५०,५५४ शेतकऱ्यांना १,०६२,कोटी ६ लाख रुपयांचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत ६,०३९ शेतकऱ्यांना ६९.४८ कोटी, जिल्हा बँकेला ८८,९७० शेतकऱ्यांना ५१६.६० कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत १७,६४२ शेतकऱ्यांना १६५ कोटी, १८ लाखांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण बँकेला १३ कोटी ८८ लाख रूपयांचे लक्ष्यांक असताना १९३ शेतकऱ्यांना एक कोटी ८२ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. मंगळवारच्या बैठकीत ठरणार दिशाराज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी रविवारी घोषित केल्यानंतर सोमवारपासून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे आदेश दिले. मात्र बँकांची स्थिती जैसे थै आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी कर्जवाटप विषयक घटकांची आढावा बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतरच जिल्ह्यातील कर्जवाटपाचा वेग वाढणार आहे.