शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख शेतकरी कर्जमुक्त

By admin | Updated: June 13, 2017 00:01 IST

शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, याचा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतकरी आंदोलनाचे यश : पाच एकरांवरील दीड लाख खातेदार प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, याचा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र कमाल भूधारकांसाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. कर्जमाफीविषयीचे निकष समिती ठरविणार असल्याने महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. या सर्व खातेदारांना आजपासूनच कर्ज वाटपाचे आदेश शासनाने दिल्याने आता कर्ज वाटपाचा टक्का वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे हे फलित होय.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यात उसळलेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकामुळे अखेर शासनाने नमते घेतले व अल्प भूधारकांना रविवारी कर्जमाफी दिली. या सर्व शेतकऱ्यांना सोमवारपासून कर्ज देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र जिल्ह्यातील बँकांनी अद्याप थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज दिलेले नाही. घोषणा जरी शासनाने केली असली तरी प्रत्यक्षात बँकांना याविषयीचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे एक, दोन दिवसांत बँकांव्दारा कर्जवाटप सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी मंगळवारी कर्ज वाटपविषयक सर्व यंत्रणांची बैठक बोल्यावली आहे. यामध्ये शासनाचे सूचना देण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने पीककर्ज वाटपाचा वेग वाढणार आहे. जिल्ह्यात पाच एकरांच्या आतील ३ लाख ८ हजार ४६४ शेतकरी खातेदार आहेत. पैकी किमान अडीच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ होणार आहे. संयुक्त समितीच्या निर्णयाची प्रतीक्षाअमरावती : जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ३११ शेतकऱ्यांकडे पाच एकराच्या वर शेती आहे. यापैकी ६ एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी निकष काय असावेत यासाठी सुकाणू समिती व शासनाचे सदस्य यांची संयुक्त समितीमध्ये बैठका होतील. त्यानंतर हा मुद्दा निकाली निघणार आहे. तोवर दीड लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात ३.३३ लाख शेतकरी कर्जदारजिल्ह्यात ४.१५ लाख शेतकरी खातेदार आहेत. यापैकी तीन लाख ३३ हजार १९७ शेतकरी कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ३६,८३३, राष्टीयीकृत बँकेचे २,३८,०२१ व ग्रामीण बँकेचे १,९८४ शेतकरी कर्जदार आहेत. अद्याप ६५,२७८ शेतकऱ्यांनी कर्जाचा लाभ घेतला नाही तर १,७५७ शेतकरी खातेदारच नाहीत. मागील वर्षी १,६५,७७१ शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज घेतले आहे. जिल्ह्यात १,६७,४२६ शेतकरी विवीध बँकांचे थकबाकीदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ३६,८८३, राष्टीयकृत बँकेचे १,३१,००१, तर ग्रामीण बँकेचे ५०२ शेतकरी थकबाकीदार आहेतयंदा १,३५४ कोटींचे कर्जवाटप बाकीयंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना १,५९२ कोटी ५४ लाखांचे पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक आहे त्या तुलनेत सद्यस्थितीत बँकांनी १,३५४ कोटी ५२ लाक रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राष्टीयीकृत बँकांना १,५०,५५४ शेतकऱ्यांना १,०६२,कोटी ६ लाख रुपयांचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत ६,०३९ शेतकऱ्यांना ६९.४८ कोटी, जिल्हा बँकेला ८८,९७० शेतकऱ्यांना ५१६.६० कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत १७,६४२ शेतकऱ्यांना १६५ कोटी, १८ लाखांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण बँकेला १३ कोटी ८८ लाख रूपयांचे लक्ष्यांक असताना १९३ शेतकऱ्यांना एक कोटी ८२ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. मंगळवारच्या बैठकीत ठरणार दिशाराज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी रविवारी घोषित केल्यानंतर सोमवारपासून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे आदेश दिले. मात्र बँकांची स्थिती जैसे थै आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी कर्जवाटप विषयक घटकांची आढावा बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतरच जिल्ह्यातील कर्जवाटपाचा वेग वाढणार आहे.