शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख शेतकरी कर्जमुक्त

By admin | Updated: June 13, 2017 00:01 IST

शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, याचा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतकरी आंदोलनाचे यश : पाच एकरांवरील दीड लाख खातेदार प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, याचा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र कमाल भूधारकांसाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. कर्जमाफीविषयीचे निकष समिती ठरविणार असल्याने महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. या सर्व खातेदारांना आजपासूनच कर्ज वाटपाचे आदेश शासनाने दिल्याने आता कर्ज वाटपाचा टक्का वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे हे फलित होय.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यात उसळलेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकामुळे अखेर शासनाने नमते घेतले व अल्प भूधारकांना रविवारी कर्जमाफी दिली. या सर्व शेतकऱ्यांना सोमवारपासून कर्ज देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र जिल्ह्यातील बँकांनी अद्याप थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज दिलेले नाही. घोषणा जरी शासनाने केली असली तरी प्रत्यक्षात बँकांना याविषयीचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे एक, दोन दिवसांत बँकांव्दारा कर्जवाटप सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी मंगळवारी कर्ज वाटपविषयक सर्व यंत्रणांची बैठक बोल्यावली आहे. यामध्ये शासनाचे सूचना देण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने पीककर्ज वाटपाचा वेग वाढणार आहे. जिल्ह्यात पाच एकरांच्या आतील ३ लाख ८ हजार ४६४ शेतकरी खातेदार आहेत. पैकी किमान अडीच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ होणार आहे. संयुक्त समितीच्या निर्णयाची प्रतीक्षाअमरावती : जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ३११ शेतकऱ्यांकडे पाच एकराच्या वर शेती आहे. यापैकी ६ एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी निकष काय असावेत यासाठी सुकाणू समिती व शासनाचे सदस्य यांची संयुक्त समितीमध्ये बैठका होतील. त्यानंतर हा मुद्दा निकाली निघणार आहे. तोवर दीड लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात ३.३३ लाख शेतकरी कर्जदारजिल्ह्यात ४.१५ लाख शेतकरी खातेदार आहेत. यापैकी तीन लाख ३३ हजार १९७ शेतकरी कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ३६,८३३, राष्टीयीकृत बँकेचे २,३८,०२१ व ग्रामीण बँकेचे १,९८४ शेतकरी कर्जदार आहेत. अद्याप ६५,२७८ शेतकऱ्यांनी कर्जाचा लाभ घेतला नाही तर १,७५७ शेतकरी खातेदारच नाहीत. मागील वर्षी १,६५,७७१ शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज घेतले आहे. जिल्ह्यात १,६७,४२६ शेतकरी विवीध बँकांचे थकबाकीदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ३६,८८३, राष्टीयकृत बँकेचे १,३१,००१, तर ग्रामीण बँकेचे ५०२ शेतकरी थकबाकीदार आहेतयंदा १,३५४ कोटींचे कर्जवाटप बाकीयंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना १,५९२ कोटी ५४ लाखांचे पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक आहे त्या तुलनेत सद्यस्थितीत बँकांनी १,३५४ कोटी ५२ लाक रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राष्टीयीकृत बँकांना १,५०,५५४ शेतकऱ्यांना १,०६२,कोटी ६ लाख रुपयांचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत ६,०३९ शेतकऱ्यांना ६९.४८ कोटी, जिल्हा बँकेला ८८,९७० शेतकऱ्यांना ५१६.६० कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत १७,६४२ शेतकऱ्यांना १६५ कोटी, १८ लाखांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण बँकेला १३ कोटी ८८ लाख रूपयांचे लक्ष्यांक असताना १९३ शेतकऱ्यांना एक कोटी ८२ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. मंगळवारच्या बैठकीत ठरणार दिशाराज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी रविवारी घोषित केल्यानंतर सोमवारपासून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे आदेश दिले. मात्र बँकांची स्थिती जैसे थै आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी कर्जवाटप विषयक घटकांची आढावा बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतरच जिल्ह्यातील कर्जवाटपाचा वेग वाढणार आहे.