शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By admin | Updated: August 10, 2015 00:02 IST

मागील वर्षी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळस्थिती होती. पैसेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने प्रचलीत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना ...

जिल्ह्याला पाऊणेनऊ कोटी : साडेतीन कोटींचे बँकांना वाटपअमरावती : मागील वर्षी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळस्थिती होती. पैसेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने प्रचलीत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी २४२ कोटी ९९ लाख ६९ हजार ४५४ रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. यामध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदा पुन्हा ८ कोटी ७५ लाखांचा निधी शासनाद्वारा जिल्ह्यास वितरित करण्यात आला आहे.या दुष्काळ निधीचे २९ हजार २९९ खातेदारापैकी ७ हजार ४११ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ४८ लाख ८६ हजार १६१ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात बँकेत जमा करण्यात आलेला आहे. यापैकी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३ हजार २०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ९१ लाख २९ हजार ९८० रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १ कोटी २४ लाख ९ हजार ५७०, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३६ लाख ६९ हजार ३७०, दर्यापूर तालुक्यात ५१ लाख ६० हजार २००, अंजनगाव तालुक्यात ७४ लाख ६ हजार ४८०, वरुड तालुक्यात ५० हजार व चिखलदऱ्यात ४३, ४ हजार ३६० रुपये सद्यस्थिती जमा करण्यात आले आहे. ही टक्केवारी ३९.८७ आहे. यामध्ये भातकुली, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, धारणी तालुके निरंक आहेत.शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अमरावती तालुक्यात ३ हजार शेतकऱ्यांसाठी १ कोटी २४ लाख ९ हजार ५७०, भातकुली तालुक्यात ४४२ शेतकऱ्यांसाठी २१ लाख १० हजार ७१५, नांदगाव तालुक्यात ६७५ शेतकऱ्यांसाठी ३६ लाख ६९ हजार ३७०, दर्यापूर तालुक्यात १ हजार १४१ शेतकऱ्यांसाठी ५१ लाख ६० हजार २००, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७४ लाख ६ हजार ४८०, चांदूरबाजार तालुक्यात १२ लाख ८० हजार ७११, मोर्शी तालुक्यात ५१७ शेतकऱ्यांसाठी, २३ लाख ६४ हजार ७५५, वरुड तालुक्यात १२ शेतकऱ्यांसाठी ५० हजार व चिखलदरा तालुक्यात ९६ शेतकऱ्यांसाठी ४ लाख ३४ हजार ३६० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षीचा दुष्काळ, त्यानंतर रबी हंगामात अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असतानाच दुष्काळाचा प्रलंबित निधी ऐन अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मिळाला आहे. (प्रतिनिधी)यंदा वितरित केलेला मदत निधीगतवर्षी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊणेनऊ कोटी रुपये शासनाने जिल्ह्यात वितरित केले आहे. यामध्ये अमरावती तालुक्याला २ कोटी २५ लाख ६८ हजार १२५, भातकुली २५ लाख, धामणगाव ८२ लाख २८ हजार, नांदगाव १ कोटी ४० लाख, दर्यापूर ९० लाख, अंजनगाव १ कोेटी, चांदूररेल्वे ३० लाख, चांदूर बाजार १ कोटी, वरुड ६० लाख, धारणी ९ लाख ५५ हजार ८०, व चिखलदरा तालुक्यास १२ लाख ४८ हजार ७९५ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.