शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दुष्काळाचे तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By admin | Updated: August 10, 2015 00:02 IST

मागील वर्षी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळस्थिती होती. पैसेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने प्रचलीत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना ...

जिल्ह्याला पाऊणेनऊ कोटी : साडेतीन कोटींचे बँकांना वाटपअमरावती : मागील वर्षी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळस्थिती होती. पैसेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने प्रचलीत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी २४२ कोटी ९९ लाख ६९ हजार ४५४ रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. यामध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदा पुन्हा ८ कोटी ७५ लाखांचा निधी शासनाद्वारा जिल्ह्यास वितरित करण्यात आला आहे.या दुष्काळ निधीचे २९ हजार २९९ खातेदारापैकी ७ हजार ४११ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ४८ लाख ८६ हजार १६१ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात बँकेत जमा करण्यात आलेला आहे. यापैकी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३ हजार २०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ९१ लाख २९ हजार ९८० रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १ कोटी २४ लाख ९ हजार ५७०, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३६ लाख ६९ हजार ३७०, दर्यापूर तालुक्यात ५१ लाख ६० हजार २००, अंजनगाव तालुक्यात ७४ लाख ६ हजार ४८०, वरुड तालुक्यात ५० हजार व चिखलदऱ्यात ४३, ४ हजार ३६० रुपये सद्यस्थिती जमा करण्यात आले आहे. ही टक्केवारी ३९.८७ आहे. यामध्ये भातकुली, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, धारणी तालुके निरंक आहेत.शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अमरावती तालुक्यात ३ हजार शेतकऱ्यांसाठी १ कोटी २४ लाख ९ हजार ५७०, भातकुली तालुक्यात ४४२ शेतकऱ्यांसाठी २१ लाख १० हजार ७१५, नांदगाव तालुक्यात ६७५ शेतकऱ्यांसाठी ३६ लाख ६९ हजार ३७०, दर्यापूर तालुक्यात १ हजार १४१ शेतकऱ्यांसाठी ५१ लाख ६० हजार २००, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७४ लाख ६ हजार ४८०, चांदूरबाजार तालुक्यात १२ लाख ८० हजार ७११, मोर्शी तालुक्यात ५१७ शेतकऱ्यांसाठी, २३ लाख ६४ हजार ७५५, वरुड तालुक्यात १२ शेतकऱ्यांसाठी ५० हजार व चिखलदरा तालुक्यात ९६ शेतकऱ्यांसाठी ४ लाख ३४ हजार ३६० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षीचा दुष्काळ, त्यानंतर रबी हंगामात अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असतानाच दुष्काळाचा प्रलंबित निधी ऐन अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मिळाला आहे. (प्रतिनिधी)यंदा वितरित केलेला मदत निधीगतवर्षी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊणेनऊ कोटी रुपये शासनाने जिल्ह्यात वितरित केले आहे. यामध्ये अमरावती तालुक्याला २ कोटी २५ लाख ६८ हजार १२५, भातकुली २५ लाख, धामणगाव ८२ लाख २८ हजार, नांदगाव १ कोटी ४० लाख, दर्यापूर ९० लाख, अंजनगाव १ कोेटी, चांदूररेल्वे ३० लाख, चांदूर बाजार १ कोटी, वरुड ६० लाख, धारणी ९ लाख ५५ हजार ८०, व चिखलदरा तालुक्यास १२ लाख ४८ हजार ७९५ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.