शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

हजारो क्विंटल कापसाची साठवणूक; शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:03 IST

कापूस उत्पादकांची कोंडी : सीसीआयने आखडला हात

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : बाजार यंदा कापसाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे दरवाढीच्या आशेने कापूस घरात साठवून ठेवल्याने आता अंगाला खाज सुटली आहे. यंदा अतिवृष्टी, बोंडअळी, नापिकीच्या धसक्याने कापूस उत्पादक शेतकरी हादरला होता. शेकडो हेक्टर पिके नेस्तनाबूत झाली. त्यामुळे कापसाच्या शेतीला उत्पादनात मोठ्याप्रमाणावर घट झाली. अतिवृष्टीच्या तावडीतून वाचलेली कपाशी कशीबशी सावरली. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते, मजुरांची टंचाई यातून सावरलेल्या पिकांना शेतकऱ्यांना सध्या कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत आहे. फेब्रुवारी मध्यावर असतानाही भाव ७१५० रुपयांवर स्थिरावला आहे. याभावात शेतकरी परवडत नसल्याने माल घरातच साठवला असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. 

सीसीआयने आखडला हातहमीभावाने जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये कधी केंद्र बंद तर बहुतेकवेळी खरेदीची मंदगती असते. सीसीआयच्या या पावित्र्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. 

"निसर्गाची अवकृपा शासनाचे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. इतर पिकांपेक्षा कापूस पिकावर खर्च जास्त होत असल्याने कापूस या भावात परवडत नाही नाइलाजाने विकल्याशिवाय पर्याय नाही."- राजाभाऊ गुडधे, शेतीनिष्ठ शेतकरी, अमडापूर (राजुरा बाजार), ता. वरूड

"यंदा कपाशीचे उत्पादन कमी आहे. दरवाढ होईल या अपेक्षेने घरातच साठवून ठेवला आहे. भाव मात्र अत्यल्प आहे. खासगी बाजारपेठेत ७००० ते ७१५० रुपये दर असल्याने साठवणूक केली आहे."- शिवहरी गोमकाळे, शेतकरी, राजुरा बाजार

"कापसाचे दर रुई, सरकीवर अवलंबून आहे. पुढील महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर माल बाजारात येईल."- राजेश गांधी, कापूस व्यापारी, वरूड

टॅग्स :cottonकापूसAmravatiअमरावतीFarmerशेतकरी