शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हजारो क्विंटल कापसाची साठवणूक; शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:03 IST

कापूस उत्पादकांची कोंडी : सीसीआयने आखडला हात

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : बाजार यंदा कापसाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे दरवाढीच्या आशेने कापूस घरात साठवून ठेवल्याने आता अंगाला खाज सुटली आहे. यंदा अतिवृष्टी, बोंडअळी, नापिकीच्या धसक्याने कापूस उत्पादक शेतकरी हादरला होता. शेकडो हेक्टर पिके नेस्तनाबूत झाली. त्यामुळे कापसाच्या शेतीला उत्पादनात मोठ्याप्रमाणावर घट झाली. अतिवृष्टीच्या तावडीतून वाचलेली कपाशी कशीबशी सावरली. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते, मजुरांची टंचाई यातून सावरलेल्या पिकांना शेतकऱ्यांना सध्या कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत आहे. फेब्रुवारी मध्यावर असतानाही भाव ७१५० रुपयांवर स्थिरावला आहे. याभावात शेतकरी परवडत नसल्याने माल घरातच साठवला असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. 

सीसीआयने आखडला हातहमीभावाने जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये कधी केंद्र बंद तर बहुतेकवेळी खरेदीची मंदगती असते. सीसीआयच्या या पावित्र्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. 

"निसर्गाची अवकृपा शासनाचे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. इतर पिकांपेक्षा कापूस पिकावर खर्च जास्त होत असल्याने कापूस या भावात परवडत नाही नाइलाजाने विकल्याशिवाय पर्याय नाही."- राजाभाऊ गुडधे, शेतीनिष्ठ शेतकरी, अमडापूर (राजुरा बाजार), ता. वरूड

"यंदा कपाशीचे उत्पादन कमी आहे. दरवाढ होईल या अपेक्षेने घरातच साठवून ठेवला आहे. भाव मात्र अत्यल्प आहे. खासगी बाजारपेठेत ७००० ते ७१५० रुपये दर असल्याने साठवणूक केली आहे."- शिवहरी गोमकाळे, शेतकरी, राजुरा बाजार

"कापसाचे दर रुई, सरकीवर अवलंबून आहे. पुढील महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर माल बाजारात येईल."- राजेश गांधी, कापूस व्यापारी, वरूड

टॅग्स :cottonकापूसAmravatiअमरावतीFarmerशेतकरी