शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST

असाईनमेंट पान ४ अमरावती : वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यासाठी ई-चालान पद्धती सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम ...

असाईनमेंट पान ४

अमरावती : वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यासाठी ई-चालान पद्धती सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम मोडले, तर अशा व्यक्तींवर ई-चालान फाडण्यात येते. वाहनधारकांच्या वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडही आकारला जातो. ई-चालान पद्धतीने दंडाची ही रक्कम थेट शासनाच्या तिजोरीत जमा होते. याशिवाय किती रुपयांचा दंड आकारला गेला, याची माहिती तात्काळ मिळते. याशिवाय ज्या वाहनचालकांनी दंड भरला नाही, अशांवर अनपेड चालान आकारले जाते.

शहरात ते प्रमाण नगण्य आहे. मात्र, अनेक वाहनचालकांना याची माहिती मोबाईल नंबर बदलल्याने दंड झाल्यानंतरच माहिती पडते. यामुळे पुढील काळात वाहनचालकांना सतर्क राहावे लागणार आहे.

अनपेड चालानचा बडगा

नियमांचे उल्लंघन करणारे अनेक जण पोलिसांशी हुज्जत घालतात. अशावेळी काही जण दंडाची रक्कम देत नाही. त्यांच्यावर अनपेड चालानचा बडगा उगारला जातो. पुढील वेळेस हे वाहन नजरेस येताच दोनही वेळचा दंड भरावा लागतो. त्याने दंड न भरल्यास त्याचे वाहन थेट पोलीस जमा होते.

कसे फाडले जाते ई-चालान

नियमांचे उल्लंघन करणारा वाहनचालक दिसताच वाहतूक पोलीस अशा वाहनधारकांना रोखतात. त्याच्याकडे कागदपत्रांची तपासणी करतात. यानंतर ई-चलान फाडले जाते. ई-चालान फाडताना एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसेल किंवा असा व्यक्ती अधिक हुज्जत घालत असेल, तर अशा व्यक्तीचे चालान अनपेड चालान म्हणून नोंदविले जाते. ही व्यक्ती पुढे जेव्हा वाहन घेऊन सापडतो त्यावेळी गाडीचा नंबर लिहिताच अनपेड चालान दिसते.

मोबाईल अपडेट केला आहे का?

फाडलेले ई-चालान संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर पाठविले जाते. या व्यक्तीने आपला मोबाईल नंबर बदलला, तर त्याला या चालानबद्दल माहितीच नसते. यामुळे व्यक्तींनी आपला मोबाईल नंबर वारंवार अपडेट करणे महागात पडते. यामुळे एकाच वेळी फार मोठ्या दंडाची रक्कम भरावी लागते.

दंड झालेल्या वाहनांकडून पूर्ण वसुली

वाहतूक शाखा दंड झालेल्या वाहनधारकांकडून तात्काळ दंड वसूल करते. काही मोजक्याच प्रकरणात अनपेड चालान फाडले जाते. मात्र, शहरात असे प्रमाण फार कमी आहे. दंडाची वसुली झाली नाही, असे फारसे घडत नाही.

विजय कुरळकर, वाहतूक पोलीस निरीक्षक

//////////

ई चालानद्वारे झालेला दंड

२०२१ : वसूल दंड : ८५, २३,२००