शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST

असाईनमेंट पान ४ अमरावती : वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यासाठी ई-चालान पद्धती सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम ...

असाईनमेंट पान ४

अमरावती : वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यासाठी ई-चालान पद्धती सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम मोडले, तर अशा व्यक्तींवर ई-चालान फाडण्यात येते. वाहनधारकांच्या वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडही आकारला जातो. ई-चालान पद्धतीने दंडाची ही रक्कम थेट शासनाच्या तिजोरीत जमा होते. याशिवाय किती रुपयांचा दंड आकारला गेला, याची माहिती तात्काळ मिळते. याशिवाय ज्या वाहनचालकांनी दंड भरला नाही, अशांवर अनपेड चालान आकारले जाते.

शहरात ते प्रमाण नगण्य आहे. मात्र, अनेक वाहनचालकांना याची माहिती मोबाईल नंबर बदलल्याने दंड झाल्यानंतरच माहिती पडते. यामुळे पुढील काळात वाहनचालकांना सतर्क राहावे लागणार आहे.

अनपेड चालानचा बडगा

नियमांचे उल्लंघन करणारे अनेक जण पोलिसांशी हुज्जत घालतात. अशावेळी काही जण दंडाची रक्कम देत नाही. त्यांच्यावर अनपेड चालानचा बडगा उगारला जातो. पुढील वेळेस हे वाहन नजरेस येताच दोनही वेळचा दंड भरावा लागतो. त्याने दंड न भरल्यास त्याचे वाहन थेट पोलीस जमा होते.

कसे फाडले जाते ई-चालान

नियमांचे उल्लंघन करणारा वाहनचालक दिसताच वाहतूक पोलीस अशा वाहनधारकांना रोखतात. त्याच्याकडे कागदपत्रांची तपासणी करतात. यानंतर ई-चलान फाडले जाते. ई-चालान फाडताना एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसेल किंवा असा व्यक्ती अधिक हुज्जत घालत असेल, तर अशा व्यक्तीचे चालान अनपेड चालान म्हणून नोंदविले जाते. ही व्यक्ती पुढे जेव्हा वाहन घेऊन सापडतो त्यावेळी गाडीचा नंबर लिहिताच अनपेड चालान दिसते.

मोबाईल अपडेट केला आहे का?

फाडलेले ई-चालान संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर पाठविले जाते. या व्यक्तीने आपला मोबाईल नंबर बदलला, तर त्याला या चालानबद्दल माहितीच नसते. यामुळे व्यक्तींनी आपला मोबाईल नंबर वारंवार अपडेट करणे महागात पडते. यामुळे एकाच वेळी फार मोठ्या दंडाची रक्कम भरावी लागते.

दंड झालेल्या वाहनांकडून पूर्ण वसुली

वाहतूक शाखा दंड झालेल्या वाहनधारकांकडून तात्काळ दंड वसूल करते. काही मोजक्याच प्रकरणात अनपेड चालान फाडले जाते. मात्र, शहरात असे प्रमाण फार कमी आहे. दंडाची वसुली झाली नाही, असे फारसे घडत नाही.

विजय कुरळकर, वाहतूक पोलीस निरीक्षक

//////////

ई चालानद्वारे झालेला दंड

२०२१ : वसूल दंड : ८५, २३,२००