शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तहानलेले जिल्हावासी अन् निगरगट्ट गटविकास अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:24 IST

अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असताना पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे अहवालच प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेला कृती आराखडा तयार करता आला नाही.

ठळक मुद्देनियोजन कोलमडले : पुन्हा पाठविली अहवालाची प्रत

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असताना पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे अहवालच प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेला कृती आराखडा तयार करता आला नाही.पाणीटंचाई कृती आराखडा साधारणत: आॅक्टोबरमध्ये तयार केला जातो. दरवर्षीच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर ते जूनपर्यंत संभाव्य पाणीटंचाईची गावे, वाड्या आणि उपाययोजनांचा समावेश असतो. यावर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सर्व गटविकास अधिकाºयांना संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा अहवाल मागितला. मात्र, अद्याप एक-दोन पंचायत समित्यांनी अहवाल पाठविला नसल्याने त्यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला. अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईची गडद छाया आहे. ३०० च्या वर गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर असताना गटविकास अधिकारी मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी ऐनवेळी कृती आराखडा धुडकावून लावला होता. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी पाणी टंचाई उपाययोजनांसाठी का खर्च केला नाही, असा जाब त्यांनी विचारला होता. त्यामुळे यंदा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची तयारी चालविली. मात्र, गटविकास अधिकारी किती गांभीर्याने हा विषय घेतात, यावरच आराखड्याचे नियोजन अवलंबून आहे.वेळेवर बैठकी न झाल्याचा फटकासंबंधित आमदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन पंचायत समितीतर्फे पाणीटंचाई आराखडा तयार केला जातो. मात्र, बैठकी वेळेवर नसल्यामुळे अहवाल पाठविण्यास उशीर होत असल्याचा सूर पंचायत समिती स्तरावरून ऐकायला मिळतो. दुसरीकडे जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी आढावा बैठकांचा सपाटा लावणार आहेत. या बैठकीतील उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश होणार का, हा प्रश्नही कायम आहे.