शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेले जिल्हावासी अन् निगरगट्ट गटविकास अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:24 IST

अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असताना पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे अहवालच प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेला कृती आराखडा तयार करता आला नाही.

ठळक मुद्देनियोजन कोलमडले : पुन्हा पाठविली अहवालाची प्रत

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असताना पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे अहवालच प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेला कृती आराखडा तयार करता आला नाही.पाणीटंचाई कृती आराखडा साधारणत: आॅक्टोबरमध्ये तयार केला जातो. दरवर्षीच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर ते जूनपर्यंत संभाव्य पाणीटंचाईची गावे, वाड्या आणि उपाययोजनांचा समावेश असतो. यावर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सर्व गटविकास अधिकाºयांना संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा अहवाल मागितला. मात्र, अद्याप एक-दोन पंचायत समित्यांनी अहवाल पाठविला नसल्याने त्यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला. अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईची गडद छाया आहे. ३०० च्या वर गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर असताना गटविकास अधिकारी मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी ऐनवेळी कृती आराखडा धुडकावून लावला होता. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी पाणी टंचाई उपाययोजनांसाठी का खर्च केला नाही, असा जाब त्यांनी विचारला होता. त्यामुळे यंदा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची तयारी चालविली. मात्र, गटविकास अधिकारी किती गांभीर्याने हा विषय घेतात, यावरच आराखड्याचे नियोजन अवलंबून आहे.वेळेवर बैठकी न झाल्याचा फटकासंबंधित आमदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन पंचायत समितीतर्फे पाणीटंचाई आराखडा तयार केला जातो. मात्र, बैठकी वेळेवर नसल्यामुळे अहवाल पाठविण्यास उशीर होत असल्याचा सूर पंचायत समिती स्तरावरून ऐकायला मिळतो. दुसरीकडे जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी आढावा बैठकांचा सपाटा लावणार आहेत. या बैठकीतील उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश होणार का, हा प्रश्नही कायम आहे.