शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

अमरावतीत उभारणार एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, विष्णू सावरा यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 19:19 IST

आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अमरावतीत एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारणार, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे दिली.

चिखलदरा (अमरावती) : आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अमरावतीत एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारणार, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे दिली.    चिखलदरा येथे आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी आले असता  ना. सावरा यांनी ही घोषणा केली. यावेळी विशेष अतिथी म्हणून अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष विजया सोमवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर, निवासी नायब तहसीलदार सैफन नदाफ आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. सावरा म्हणाले, आदिवासी विकास मंत्रालयाचे बजेट तीन कोटींचे आहे. याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. यापूर्वीही बराच निधी आदिवासीच्या विकासासाठी खर्च झाला. परंतु विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. १९७२ साली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळाची निर्मिती झाली. तेव्हापासून शिक्षणाप्रती जागृती निर्माण झाली. राज्यात सध्या ४८१ आश्रमशाळा आहेत. तरीही आश्रमशाळा कमी पडत आहेत. मुलांना प्रवेश मिळत नाहीत. त्यामुळे आता स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून आश्रमशाळा, वसतिगृहे संचालित केली जातात. आदिवासी विकास विभागाच्या राज्यात १२५ शाळा असून, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी (डीबीटी) हा कायदा आणला. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल आणि त्यातून ते पुस्तक, वह्या, कपडे, साबण खरेदी करतील व त्यांना वेळेवर आवश्यक साहित्य खरेदी करता येईल. आदिवासी मुलांनाही इतर मुलांच्या स्पर्धेत टिकता यावे, यासाठी नामांकित शाळेत प्रवेश मिळण्याची व्यवस्था केली. पेसा कायदा, वनहक्क कायदा यासह अनेक कायदे तयार करून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी आ. प्रभुदास भिलावेकर म्हणाले, आम्ही वसतिगृहाची मागणी केली आणि ना. सावरा यांनी ती मागणी मान्य केली. हिवरखेड ते धारणी वीज जोडणीसाठी दोन कोटींचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार आनंदराव अडसूळ यांनी मेळघाटात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी बºयाच योजना आणल्या. नुकताच खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून हनी क्लस्टरच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना हनिच्या पेट्याचे वाटप केल्याचे त्यांनी नमूद केले.