शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महात्मा गांधींच्या विचारांचा पिंपळवृक्षाद्वारे प्रसार, 1936 च्या स्मृतींना उजाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 19:33 IST

राज्यात 152 स्मारकांवर एकाच दिवशी वृक्षारोपण : सेवाग्राम आश्रमातील 

गणेश वासनिक

अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी कुणालाही अपरिचित नाहीत. तथापि, त्यांच्या विचारांचा प्रसार सर्वदूर होण्याच्या अनिवार इच्छेने वनविभागाने 150 व्या जयंतीचे औचित्य साधून 1936 साली सेवाग्राम आश्रमात त्यांनी लावलेल्या पिंपळवृक्षाची अनेक रोपटी लावली. राज्यात 152 शहीद स्मारकांवर बुधवारी ही रोपे लावण्यात आली आहेत. 

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याचे वनविभागाने निश्चित केले होते. त्याअनुषंगाने राष्ट्रपित्याची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे 1936 साली त्यांच्याच हस्ते लावल्या गेलेल्या पिंपळवृक्षाच्या बियांची रोपे तयार करून शहीद स्मारकस्थळी लावण्यात आली. सेवाग्राम येथील पिंपळवृक्षाच्या बिया सामाजिक वनीकरण विभागाने गोळा करून वर्षभरात रोपे तयार केली. 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंतीदिनी विविध 152 स्मारक परिसरात शहीद कुटुंबांतील सदस्य, जिल्हाधिकारी व वनाधिकाºयांच्या हस्ते पिंपळाचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम चांद्यापासून बांद्यापर्यंत एकाच दिवशी राबविण्यात आला. या पिंपळ वृक्षाचे जतन, संगोपनाची जबाबदारीसुद्धा वनविभागाने निश्चित केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार पिंपळवृक्षाप्रमाणे बहरावे, सर्वदूर जावेत, हा वनविभागाचा हेतू यामागे आहे. 

एका शहीद स्मारकस्थळी चार पिंपळ वृक्षाचे जतनवनविभागाने एका शहीद स्मारक स्थळावर चार पिंपळ रोपे लावली आहेत. या रोपांचे संगोपन, जतन करण्यासाठी नोडल कर्मचारी नियुक्ती केले जाणार आहेत. वनविभागाच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राज्यभरात एकाच वेळी राबविण्यात आला. रोपे तयार करण्यासाठी वर्धा येथील सामाजिक वनीकरणाने मोठा वाटा उचलला आहे.

जिल्ह्यात 10 शहीद स्मारकस्थळांची वृक्षारोपणासाठी निवड करण्यात आली. या रोपांचे जतन, संगोपनासाठी नोडल कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. एका शहीद स्मारकावर चार रोपे लावण्यात आली आहेत. - गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक, अमरावती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीAmravatiअमरावती