शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

महात्मा गांधींच्या विचारांचा पिंपळवृक्षाद्वारे प्रसार, 1936 च्या स्मृतींना उजाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 19:33 IST

राज्यात 152 स्मारकांवर एकाच दिवशी वृक्षारोपण : सेवाग्राम आश्रमातील 

गणेश वासनिक

अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी कुणालाही अपरिचित नाहीत. तथापि, त्यांच्या विचारांचा प्रसार सर्वदूर होण्याच्या अनिवार इच्छेने वनविभागाने 150 व्या जयंतीचे औचित्य साधून 1936 साली सेवाग्राम आश्रमात त्यांनी लावलेल्या पिंपळवृक्षाची अनेक रोपटी लावली. राज्यात 152 शहीद स्मारकांवर बुधवारी ही रोपे लावण्यात आली आहेत. 

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याचे वनविभागाने निश्चित केले होते. त्याअनुषंगाने राष्ट्रपित्याची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे 1936 साली त्यांच्याच हस्ते लावल्या गेलेल्या पिंपळवृक्षाच्या बियांची रोपे तयार करून शहीद स्मारकस्थळी लावण्यात आली. सेवाग्राम येथील पिंपळवृक्षाच्या बिया सामाजिक वनीकरण विभागाने गोळा करून वर्षभरात रोपे तयार केली. 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंतीदिनी विविध 152 स्मारक परिसरात शहीद कुटुंबांतील सदस्य, जिल्हाधिकारी व वनाधिकाºयांच्या हस्ते पिंपळाचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम चांद्यापासून बांद्यापर्यंत एकाच दिवशी राबविण्यात आला. या पिंपळ वृक्षाचे जतन, संगोपनाची जबाबदारीसुद्धा वनविभागाने निश्चित केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार पिंपळवृक्षाप्रमाणे बहरावे, सर्वदूर जावेत, हा वनविभागाचा हेतू यामागे आहे. 

एका शहीद स्मारकस्थळी चार पिंपळ वृक्षाचे जतनवनविभागाने एका शहीद स्मारक स्थळावर चार पिंपळ रोपे लावली आहेत. या रोपांचे संगोपन, जतन करण्यासाठी नोडल कर्मचारी नियुक्ती केले जाणार आहेत. वनविभागाच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राज्यभरात एकाच वेळी राबविण्यात आला. रोपे तयार करण्यासाठी वर्धा येथील सामाजिक वनीकरणाने मोठा वाटा उचलला आहे.

जिल्ह्यात 10 शहीद स्मारकस्थळांची वृक्षारोपणासाठी निवड करण्यात आली. या रोपांचे जतन, संगोपनासाठी नोडल कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. एका शहीद स्मारकावर चार रोपे लावण्यात आली आहेत. - गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक, अमरावती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीAmravatiअमरावती