शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘त्या’ वादग्रस्त तस्माधारकांकडून पालिकेला २५ लाखांचा चुना

By admin | Updated: December 18, 2014 00:10 IST

स्थानिक पालिका हद्दीतील ८३ अस्थायी स्वरूपातील दुकानांची ‘लीज’ नगरपरिषदेने एप्रिल २००६ पासून रद्द केली तरीही आठ वर्षांपासून सदर दुकाने त्याच जागेवर कायम आहेत.

चांदूरबाजार : स्थानिक पालिका हद्दीतील ८३ अस्थायी स्वरूपातील दुकानांची ‘लीज’ नगरपरिषदेने एप्रिल २००६ पासून रद्द केली तरीही आठ वर्षांपासून सदर दुकाने त्याच जागेवर कायम आहेत. तेव्हापासून या दुकानदारांनी पालिका नियमानुसार भाडे भरले नसून मंत्रालयातील तात्पुरत्या स्थगनादेशाचे निमित्त करून हे दुकानदार विकासकामांची जागा अडवून बसले आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून एकात्मिक शहर विकास निधी इतरत्र वळविण्यात आला तरीही न.प.प्रशासनाने अद्याप या वादग्रस्त दुकानदारांचा प्रश्न निकाली काढला नाही. त्यामुळे ८ वर्षांत नगरपरिषदेला २५ लाखांचा चुना लागला आहे.पालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा गैरफायदा घेत या दुकानदारांपैकी काही तस्माधारकांनी काही दुकानांची लाखो रूपयात परस्पर विक्री करून मलिदा लाटण्याचा नवीन व्यवसाय सुरू केल्याची माहिती आहे. १२ आॅगस्ट २००३ मध्ये पालिकेने नगर रचना विभागाकडे १ कोटी ३० लक्ष रूपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठविला होता. चांदूरबाजार शहराला एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत या प्रस्तावाला २७ जानेवारी २००५ रोजी मंजुरी मिळाली. त्यात न. प. हद्दीतील साईट क्र. २२ वर दुकान केंद्रासाठी बांधकाम ५२ लक्ष, अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम ३९ लक्ष तसेच न. प. हद्दीतील शेत सर्व्हे नं. १४९ येथे कल्याण मंडपाचे बांधकामाकरिता ३९ लक्ष रूपयांमधून विकास कामे करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. यासाठी केंद्र शासनाचा २१ लक्ष ५० हजार व राज्य शासनाचा १४ लक्ष ३३ हजर असा एकूण ३५ लक्ष ८३ हजारांचा अग्रीम निधी न. प. ला प्राप्त झाला होता. आदेशानुसार नगरपरिषदेने दुकानदारांची बाजू जाणून घेतली व दस्तऐवज दाखल करून घेतले. त्यानंतर १४ जुलै २००६ च्या न. प. ठरावानुसार या दुकानांची जागा अस्थायी स्वरुपाची आहे. त्यावर ५६ गाळ्यांचे बांधकामाकरिता प्राप्त झालेला निधी जर त्या बांधकामाकरिता खर्च झाला नाही तर निधीची रक्कम शासनाला व्याजासह परत करावी लागणार होती. त्यानुसार त्या दुकानदारांना आपली दुकाने हटविण्यासाठी ३० सप्टेंबर २००६ ची मुदत देण्यात आली होती. हा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये संबंधित दुकानदारांना कळविण्यात आला होता. या निर्णयाविरूद्ध या साईटवरील अस्थायी दुकानदारांनी तत्कालीन नगर विकास मंत्रालयाचे राज्यमंत्र्यांकडून स्थगनादेश मिळवून तसे पत्र नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी न. प. ला पाठविले. त्यानंतरही न. प. ने २१ फेब्रुवारी २००७ रोजी विशेष सभा घेऊन हा स्थगनादेश उडवून दुकान केंद्र बांधकाम करण्यास मोकळीक करून देण्याची विनंती शासनास केली. मात्र हे बांधकाम रखडले आहे. (तालुका प्रतिनिधी)