शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

‘त्या’ घोळातील मृतावर दोष; विद्यमान निर्दोष

By admin | Updated: October 25, 2016 00:05 IST

जवाहरगेटस्थित संकुलातील गाळ्यांच्या भाडेकरारामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा सारा दोष मृत व्यक्तीच्या माथी मारण्यात आला आहे.

आयुक्तांचा लक्षवेध : व्यापारी संकुलातील करारनाम्यातील गैरव्यवहार दडविण्याचा प्रयत्न ?प्रदीप भाकरे अमरावतीजवाहरगेटस्थित संकुलातील गाळ्यांच्या भाडेकरारामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा सारा दोष मृत व्यक्तीच्या माथी मारण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन कालावधीत कार्यरत असलेले संबंधित कर्मचारी आणि अन्य जण निर्दोष आहेत का? किंवा त्यांना निर्दोष ठरविण्याची धडपड तर केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा कोट्यवधींचा घोळ दडपविण्याचा प्रयत्न महापालिकेतील एका कंपुने चालविला आहे. बाजार परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी तत्कालीन आयुक्त आणि संबंधित विभागप्रमुखांना अंधारात ठेवत जवाहरगेट संकुलातील गाळ्यांचा भाडे करार केला होता. त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. प्रशासनाला बेदखल करत जयस्वाल यांनी स्वअधिकारात तो घोळ घातला होता. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात तो घोळ उघडकीस आला आणि हे प्रकरण थेट सिटी कोतवालीत दाखल झाले. भाडेकरारामध्ये तेथील दुकानदारांना अल्पभाड्यात आणि दीर्घ कालावधीसाठी गाळे देण्यात आले होते. हा प्रकार समोर येताच गुडेवार यांनी फौजदारी कारवाई करण्याची तयारी दाखविली. बरहुकूम तत्कालीन उपायुक्त चंदन पाटील यांनी शहर कोतवालीत तक्रार दाखल केली. ती तक्रार पोलीस आयुक्तांकडे देण्यात आली. गंगाप्रसाद जयस्वाल व अन्य ३२ जणांनी स्व अधिकारात फसवणूक करून भाडे करारामध्ये घोळ घातल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ती तक्रार होती. त्यानंतर शहर कोतवाली पोलिस स्टेशनकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागविण्यात आली. मात्र, बाजार व परवाना विभागाने जयस्वाल आणि इतरांसंदर्भातील कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही. त्यानंतर सप्टेंबर २०१६मध्ये शहर कोतवालीच्या ठाणेदारांनी पहिले स्मरणपत्र पाठवून महापालिकेला या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती मागविली. त्या स्मरणपत्राचे उत्तर म्हणून बाजार परवानाच्या अधीक्षकांनी १९ आॅक्टोबरला शहर कोतवालीला या प्रकरणाची माहिती पाठविली आहे. मात्र, या पत्रासोबत असलेल्या तीन पानी दस्ताऐवजामध्ये संपूर्ण दोष गंगाप्रसाद जयस्वाल या मृत कर्मचाऱ्याच्या माथी मारण्यात आला आहे. महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या एका वकीलाने जयस्वाल यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले असून, इतरांबाबत या पत्रात कुठलाही उल्लेख नाही. सोबतच जयस्वाल यांचा गुन्हा फसवणुकीत मोडणारा असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असा शेरा या पत्रातून देण्यात आला आहे. त्याचवेळी अन्य कर्मचाऱ्यांची या संपूर्ण गैरव्यवहारामध्ये काय भूमिका होती, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. गंगाप्रसाद जयस्वाल या मृत कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत तर काय हशील असेल, हे महापालिका जाणून आहे. मृत कर्मचाऱ्यावर कुठलेही गुन्हे दाखल केले तर कारवाई मात्र शून्य असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गाळ्यांच्या भाडेकरारामध्ये झालेल्या गैरव्यवहाराला जयस्वालच जबाबदार असल्याचे मत महापालिकेने मांडले आहे. एसीबी चौकशी का नाही? जयस्वाल यांनी केलेला घोटाळा एसीबीच्या अखत्यारीत येणारा आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार एसीबीमध्ये केली का, अशी विचारणा पोलिसांनी महापालिकेला केली आहे. याशिवाय या प्रकारात नेमकी कुणाची फसवणूक झाली, अशी विचारणा महापालिकेला करण्यात आली आहे.