शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

जिल्ह्यात २०१ गावे तहानलेली; सात टँकरने पुरवठा, ९५ विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: May 10, 2015 23:54 IST

पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता जाणवू लागला असून लहान प्रकल्प ...

अमरावती : पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता जाणवू लागला असून लहान प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक गावांतील जलस्त्रोतांनी तळ गाठला असल्याने पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील २०१ गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाव्दारा ९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७ टँंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थिती चिखलदरा तालुक्यामधील ढोमणीफाटा व खडीमल गावात प्रत्येकी एक टँकर व चांदूररेल्वे तालुक्यामधील घुईखेड येथे ४ असे ७ टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०१ गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामध्ये सर्वाधिक ४८ गावे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. अमरावती ३२, भातकुली १२, तिवसा ९, मोर्शी ८, वरुड ८, चांदूररेल्वे २१, धामणगाव रेल्वे २५, अचलपूर २८, चांदूरबाजार ३, अंजनगाव सुर्जी ५, दर्यापूर १, धारणी ८ व चिखलदरा तालुक्यांतील १३ गावे आहेत. जिल्ह्यात ९५ विहिरींचे अधिग्रहण एप्रिल ते जून २०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये २४ विहिरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. अमरावती १७, भातकुली १, तिवसा ८, मोर्शी ४, वरुड १५, चांदूररेल्वे १९, धामणगाव रेल्वे ५, चांदूरबाजार १ व चिखलदरा तालुक्यात १ विहीर अधिग्रहित करण्यात येणार आहे. यावर ३२ लाख ७७ हजार निधीची तरतूद आहे. (प्रतिनिधी)४४ नळयोजनांची विशेष दुरुस्तीपाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात ४४ नळयोजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ७ योजना, नांदगाव ८, भातकुली ८, तिवसा २, मोर्शी ४, वरुड ३, चांदूररेल्वे २, धामणगाव रेल्वे १, अचलपूर ३, चांदूरबाजार १ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५ योजना आहेत. यावर २ कोटी ५९ हजार निधीची तरतूद आहे. १११ नवीन विंधन विहिरीपाणीटंचाई कृती आराखड्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात १११ नवीन विंधन विहीर व कुपनलिका तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३१ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आहे. अमरावती २०, भातकुली ४, तिवसा ४, मोर्शी ४, चांदूररेल्वे ४ व धामणगाव तालुक्यात २६ आहेत. यावर ७२ लाख १८ हजारांच्या निधीची तरतूद आहे.३ कोटी ३४ हजारांच्या निधीची तरतूदएप्रिल ते जूनदरम्यान करण्यात येणाऱ्या पाणीटंचाईच्या कामावर ३ कोटी ३४ लाखा ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक भातकुली तालुक्यात ७३ लाख १४ हजार, अमरावती ५७ लाख ९५ हजार, नांदगाव ५२ लाख, तिवसा ७ लाख ४५ हजार, मोर्शी १७ लाख ९० हजार, वरुड १५ लाख २५ हजार, चांदूररेल्वे १८ लाख ६५ हजार, धामणगाव २५ लाख, अचलपूर १२ लाख ३० हजार, चांदूरबाजार ११ लाख ८ हजार, अंजनगाव १४ लाख ५० हजार, दर्यापूर १ लाख ६० हजार, धारणी १० लाख, चिखलदरा १७ लाख २० हजारांची तरतूद आहे.