शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

जिल्ह्यात २०१ गावे तहानलेली; सात टँकरने पुरवठा, ९५ विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: May 10, 2015 23:54 IST

पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता जाणवू लागला असून लहान प्रकल्प ...

अमरावती : पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता जाणवू लागला असून लहान प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक गावांतील जलस्त्रोतांनी तळ गाठला असल्याने पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील २०१ गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाव्दारा ९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७ टँंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थिती चिखलदरा तालुक्यामधील ढोमणीफाटा व खडीमल गावात प्रत्येकी एक टँकर व चांदूररेल्वे तालुक्यामधील घुईखेड येथे ४ असे ७ टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०१ गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामध्ये सर्वाधिक ४८ गावे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. अमरावती ३२, भातकुली १२, तिवसा ९, मोर्शी ८, वरुड ८, चांदूररेल्वे २१, धामणगाव रेल्वे २५, अचलपूर २८, चांदूरबाजार ३, अंजनगाव सुर्जी ५, दर्यापूर १, धारणी ८ व चिखलदरा तालुक्यांतील १३ गावे आहेत. जिल्ह्यात ९५ विहिरींचे अधिग्रहण एप्रिल ते जून २०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये २४ विहिरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. अमरावती १७, भातकुली १, तिवसा ८, मोर्शी ४, वरुड १५, चांदूररेल्वे १९, धामणगाव रेल्वे ५, चांदूरबाजार १ व चिखलदरा तालुक्यात १ विहीर अधिग्रहित करण्यात येणार आहे. यावर ३२ लाख ७७ हजार निधीची तरतूद आहे. (प्रतिनिधी)४४ नळयोजनांची विशेष दुरुस्तीपाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात ४४ नळयोजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ७ योजना, नांदगाव ८, भातकुली ८, तिवसा २, मोर्शी ४, वरुड ३, चांदूररेल्वे २, धामणगाव रेल्वे १, अचलपूर ३, चांदूरबाजार १ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५ योजना आहेत. यावर २ कोटी ५९ हजार निधीची तरतूद आहे. १११ नवीन विंधन विहिरीपाणीटंचाई कृती आराखड्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात १११ नवीन विंधन विहीर व कुपनलिका तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३१ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आहे. अमरावती २०, भातकुली ४, तिवसा ४, मोर्शी ४, चांदूररेल्वे ४ व धामणगाव तालुक्यात २६ आहेत. यावर ७२ लाख १८ हजारांच्या निधीची तरतूद आहे.३ कोटी ३४ हजारांच्या निधीची तरतूदएप्रिल ते जूनदरम्यान करण्यात येणाऱ्या पाणीटंचाईच्या कामावर ३ कोटी ३४ लाखा ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक भातकुली तालुक्यात ७३ लाख १४ हजार, अमरावती ५७ लाख ९५ हजार, नांदगाव ५२ लाख, तिवसा ७ लाख ४५ हजार, मोर्शी १७ लाख ९० हजार, वरुड १५ लाख २५ हजार, चांदूररेल्वे १८ लाख ६५ हजार, धामणगाव २५ लाख, अचलपूर १२ लाख ३० हजार, चांदूरबाजार ११ लाख ८ हजार, अंजनगाव १४ लाख ५० हजार, दर्यापूर १ लाख ६० हजार, धारणी १० लाख, चिखलदरा १७ लाख २० हजारांची तरतूद आहे.