शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
4
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
5
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
6
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
7
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
8
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
9
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
10
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
11
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
12
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
13
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
14
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
15
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
16
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
17
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
18
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
19
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
20
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

दीड महिन्यांत तापाचे ३ हजार रुग्ण; ५३१ टायफाईडचे 'पॉझिटिव्ह'

By admin | Updated: July 22, 2015 00:33 IST

हवामानाच्या असंतुलनामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल घडून आला आहे.

अमरावती : हवामानाच्या असंतुलनामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल घडून आला आहे. परिणामी जिल्ह्यातील रोगराई वाढली असून दीड महिन्यातच तापाचे तब्बल तीन हजार रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातच दाखल रुग्णांपैकी ५३१ रुग्ण तायफाईडचे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नागरिकांनी दूषित पाण्याचा वापर टाळणे व डांसाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. दरवर्षीच पावसाळ्यात जिल्ह्यात रोगराईचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पावसामुळे पाणी स्त्रोत दूषित होऊन ते पाणी नागरिकांच्या पिण्यात येते. त्यातच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डांसाचा प्रादुर्भावसुध्दा मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी रोगराई वाढल्याचे आढळून येते. यंदा पावसाळा सुरु झाल्यावर दमदार पावसाने हजेरी लावली, मात्र, मध्यंतरी पावसाने २५ दिवसांची प्रदीर्घ दडी मारल्याने वातावरणात बदल झाला आहे. १ जून ते १२ जुलैदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाचे तब्बल ३ हजार रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार २३५ रुग्णांची मलेरियाची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले नाहीत. तसेच तापाच्या १ हजार २८९ रुग्णांच्या रक्तनमुन्याची टायफाईडची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये तब्बल ५३१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या शासकीय आकडेवारीवरून जिल्ह्यातील तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्याा प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच तापाने दोन ते तीन रुग्ण दगावल्याची माहिती इर्विन रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)