शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

तेरा कोटी वृक्ष लागवडीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:03 IST

शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पाळा-सालबर्डी मार्गात चक्क रस्त्याशेजारीच रोप लावण्याचा प्रताप संबंधित यंत्रणेने चालविला आहे. त्यामुळे भविष्यात ही वृक्ष मोठी झाल्यास ती तोडावीच लागेल, ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित केली. याप्रकरणी पाळा येथील माजी उपसरपंच नरेंद्र जिचकार यांनी माहिती देऊनही वृक्ष लागवडीचे सोपस्कार पार पडले.

ठळक मुद्देजनतेच्या पैशांचा अपव्यय : रस्त्याशेजारी वृक्षारोपण, यंत्रणांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पाळा-सालबर्डी मार्गात चक्क रस्त्याशेजारीच रोप लावण्याचा प्रताप संबंधित यंत्रणेने चालविला आहे. त्यामुळे भविष्यात ही वृक्ष मोठी झाल्यास ती तोडावीच लागेल, ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित केली. याप्रकरणी पाळा येथील माजी उपसरपंच नरेंद्र जिचकार यांनी माहिती देऊनही वृक्ष लागवडीचे सोपस्कार पार पडले.मोर्शी-वरूड रस्त्यावरून पाळा मार्गाने साधारणत: दोन किलोमीटर पर्यंत वृक्षलागवड करण्यात आली. या मार्गाचे दापोरीपर्यंत रूंदीकरण प्रस्तावित असून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कामाची सुरूवात होणार आहे. अशाच प्रकारची लागवड जि. प. बांधकाम विभागामार्फत रूंदीकरण होत असलेल्या पाळा-धानोरा रस्त्यावरही करण्यात आली आहे. नियमानुसार रस्त्यापासून तीन ते चार मिटरवर वृक्षलागवड अपेक्षित आहे. असे असताना मोर्शी-वरूड रस्त्यापासून पाळा जाताना दोन किलोमीटरपर्यंत ८ ते ८ फुटावर खड्डे करून वृक्षलागवड करण्यात आली. ही रोपटे रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीने भरलेल्या ड्रमच्या आत तर आहेच. त्याशिवाय मार्गाचे रूंदीकरण होणार म्हणून वनविभाग व बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून वृक्षकटाईचे वृक्षांची नोंद घेतली. त्या वृक्षाच्या आत आहे, हे विशेष.याबाबत पाळा येथील माजी उपसरपंच तथा कृ. उ. बा. समिती संचालक नरेंद्र जिचकार यांनी शाखा अभियंता सा. बां. उपविभाग मोर्शी यांना सुरूवातीला मोबाईलद्वारे अवगत करूनही ही वृक्षलागवड करण्यात आली.शासनाने गतवर्षी ४ कोटी वृक्षलागवड केली. यात किती रोपांचे संवर्धन झालेत? हा जनतेमध्ये चर्चेचा विषय असताना यावर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचा धुमधडाका सुरू आहे. एकीकडे रस्ता रूंदीकरणात बेसुमार वृक्षकटाई करण्यात आली. आता रस्ते रूंदीकरणात सीमेतच वृक्षलागवड होत असताना शासनाच्या संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार जनतेच्या पैश्याचा अपव्यय होत असल्याचा आक्षेप नरेंद्र जिचकार यांनी नोंदविला आहे.टार्गेट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांची लगबग१३ कोटी वृक्षलागवडीत तालुक्याला मिळालेले टार्गेट पूर्ण करताना संबंधित शासकीय यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहे. शेतकरी बांधावर वृक्षलागवड करू देत नाही. तर, यंत्रणेला झाडेही लावून दाखवायची आहे. अश्यावेळी शासनाला काय साध्य करायचे हा प्रश्न जनतेला पडलेला आहे.पाहणी करून वृक्षलागवड योग्य ठिकाणी केली जाईल. लवकरच दुरुस्ती करून नव्याने लागवड करू.- डी.एस. मांगे,उपविभागीय अभियंता,सा.बां.वि.