लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील आदिवासींना चौदा दिवस क्वारंटाईन केल्यानंतर शनिवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुखरूप घरी पोहोचून दिले. घरी जाण्याची घाई त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती.देश लॉकडाऊन झाल्यानंतर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरीत झालेले आदिवासी पायदळ परत गावी निघाले. मात्र, विविध जिल्हा सीमेवर अडवून त्यांना अमरावती येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुक्रवारी त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी चिखलदरा तहसीलदार माया माने, मंडळ अधिकारी विनायक बेलसरे, तलाठी नरेश जामुनकर, धुर्वे, भुसुम आदींकडे सोपविण्यात आली. आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेत त्यांना अमरावतीहून चिखलदरा आणण्यात आले. रात्र झाल्याने त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. शनिवारी त्यांना अतिदुर्गम असलेल्या तालुक्यातील रेहट्याखेडा तर धारणी तालुक्यातील किन्हीखेडा या त्यांच्या गावी सुखरूप पोहोचून देण्यात आले.घरी जाण्याची आतुरताअनेक दिवसांपासून घरी जाण्याची इच्छा असतानाही आजाराची लक्षणे पाहता जाता आले नाही. त्यामुळे घरी जाण्याची आतुरता होती. प्रत्येक दिवस आम्ही मोजून काढत होतो. व्यवस्था चांगली असली तरी परिवारात जाण्याची ओढ लागली होती. आता ‘घरीच राहू आणि सुरक्षित राहू’ असे त्यांनी सांगितले. तर क्वारंटाईन राहल्याचे प्रमाणपत्र प्रशासनाच्यावतीने त्यांना देण्यात आले.
क्वारंटाईननंतर ‘ते’ परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST
देश लॉकडाऊन झाल्यानंतर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरीत झालेले आदिवासी पायदळ परत गावी निघाले. मात्र, विविध जिल्हा सीमेवर अडवून त्यांना अमरावती येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुक्रवारी त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी चिखलदरा तहसीलदार माया माने, मंडळ अधिकारी विनायक बेलसरे, तलाठी नरेश जामुनकर, धुर्वे, भुसुम आदींकडे सोपविण्यात आली.
क्वारंटाईननंतर ‘ते’ परतले घरी
ठळक मुद्देप्रशासनाने दिले प्रमाणपत्र: ‘घरातच राहू सुरक्षित राहू’चा संदेश