शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

वरूड, मोर्शी तालुक्यांत यंदा नसणार पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

जितेंद्र दखने लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजलपातळी सरासरी चार फुटांनी वाढली. तथापि, गाळाचा ...

ठळक मुद्देपावसाचा परिणाम, जिल्हाभरात १.२७ मी.'वाॅटर लेव्हल'ची वाढ : चांदूर बाजारात जलपातळीत घट, मेळघाटात भूजल पुनभर्भरण नाही

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजलपातळी सरासरी चार फुटांनी वाढली. तथापि, गाळाचा प्रदेश असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात पाणीपातळी सरासरी एक फुटाने घटली. दुष्काळात अनेक वर्षे होरपळत असणाऱ्या वरूड, मोर्शी तालुक्यांमध्ये यंदा मात्र पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा विश्वास भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला.  जिल्ह्यात एकूण ६३ पाणलोट क्षेत्रे असून, त्यामधून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाद्वारे १५० निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीची वाचने वर्षातून चार वेळा घेण्यात येतात. ऑक्टोबरअखेर घेण्यात आलेल्या भूजलपातळीच्या नोंदीचा मागील पाच वर्षांच्या ऑक्टोबर महिन्याच्या भूजल पातळीच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास केला असता, जिल्ह्यात सरासरी १.२७ मीटरने पाणीपातळी वाढल्याचे दिसून येते. यावर्षी सर्वात जास्त १.८५ मीटरने पाणीपातळी अमरावती तालुक्यात वाढली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात पाण्याची खोली ३० मीटरपेक्षा जास्त गेल्यामुळे तेथील जवळपास सर्वच सिंचन विहिरी, ज्यांची खोली २५ ते ३० मीटर आहे, कोरड्यात पडल्या. तालुका मुख्यालयी एकच निरीक्षण विहीर असून, त्या परिसरात उपसा नाही. यामुळे सरासरी तीन मीटर पाण्याची पातळी वाढली असल्याचे निश्चित करण्यात आले. वरूड, मोर्शी तालुक्यात गतवर्षी व यावर्षीदेखील १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. वरूडमध्ये यंदा पाण्याची पातळी सरासरी १.५७ मीटरने व मोर्शी तालुक्यात १.५१ मीटरने वाढली, यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये टंचाई निर्माण होणार नाही. जिल्ह्यात सरासरी ७९२.३७ मिमी पाऊस झाला. सप्टेंबरअखेर पावसाने  १०८.९३ अशी टक्केवारी गाठली. भूजलपातळीत १.२७ मिमीने वाढ झाली आहे. चांदूर बाजार तालुका हा गाळाचा प्रदेश असून, संत्रा बागायतदार कूपनलिकांतून सतत उपसा करीत आहेत. त्यामुळे या तालुक्यात आठ ते दहा वर्षांपासून पाण्याची पातळी सतत खालावत आहे. यावर्षीसुद्धा ०.२५ मीटर अर्थात सरासरी एक फुटाने पाण्याची पातळी खालावली. गाळाचा प्रदेश असल्याने यामध्ये पावसाचे पुनर्भरण जलद गतीने होत नाही. त्यामुळे येथे भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना गरजेच्या आहेत. धारणी व चिखलदरा हा परिसर कठीण खडकाचा व उंच-सखल असल्याने येथे पावसाचे पाणी लगेच वाहून जाते. भूजलाचे पुनर्भरण पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने निरीक्षण विहिरींच्या आधारे अंदाज घेणे शक्य नाही. परंतु, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या निरीक्षण विहिरींच्या अनुषंगाने तेथे पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

या कारणांनी वाढली भूजलपातळीगतवर्षीच्या तुलनेत यंदा मुबलक पाऊस झाला. पावसाच्या दिवसांत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. याशिवाय सततच्या पावसामुळे शेतातील ओलावा कायम राहिल्याने खरिपाच्या सिंचनासाठी विहिरीद्वारे उपसा झाला नाही. 

जलयुक्त शिवार तसेच जलसंधारणाची कामे झाल्याने भूजलात वरूड व मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी या दोन्ही तालुक्यांसह चांदूर बाजार तालुक्यात अटल भूजल योजनेंतर्गत भूजल पुनर्भरणाचे सर्वेक्षण व आराखडे तयार करण्यात येत आहेत. - विश्वास वालदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक

टॅग्स :Waterपाणी