शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सोयाबीन बियाण्यांची अधिक टंचाई भासणार

By admin | Updated: May 24, 2014 23:13 IST

जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात १ लाख ९२ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यासाठी विभागाने बियाणे बदलाचे प्रमाण घटवून घरगुती बियाण्यांच्या

अमरावती : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात १ लाख ९२ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यासाठी विभागाने बियाणे बदलाचे प्रमाण घटवून घरगुती बियाण्यांच्या वापरावर भर दिला आहे. तर कपाशी आणि तुरीचे मुबलक बियाणे बाजारात उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात सोयाबीन लागवडीखाली २ लाख ७३ हजार क्षेत्र अपेक्षित आहे. हेक्टरी ७५ किलो बियाणे लागण्याचा अंदाज असून त्या हिशोबाने जिल्ह्याला २ लाख ७९ हजार क्विंटल बियाणे लागतील. पैकी ३0 क्विंटल महाबीज ५ हजार क्विंटल राष्ट्रीय बियाणे महामंडळ तर खासगीच्या २0 ते २२ कंपन्या ४0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देतील, असे कृषी विभागाला अपेक्षित आहे.

शेतकर्‍याकडे ३७ हजार क्विंटल बियाणे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातून केवळ ८७ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता राहणार असल्याने तब्बल १ लाख ९२ हजार क्विंटल बियाण्यांचा तुटवडा भासणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील महाबियाने सुरुवातीला ६0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र सोयाबीनचे लॉट मोठय़ा प्रमाणात अनुत्तीर्ण झाल्याने त्याची उपलब्धता घटवून ३0 हजार क्विंटलवर आणली गेली. महाबीजकडे या हंगामात एकूण २८ हजार क्विंटल सोयाबीन प्रक्रियेसाठी आले. पैकी २३ हजार क्विंटलची उगवण क्षमता ७0 टक्क्यांपेक्षा कमी निघाल्याने ते कसोटीवर अनुत्तीर्ण ठरले. केवळ ७00 क्विंटल बियाणे प्रमाणित झाले. २१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचा महाबीजचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थिती सर्वाधिक भयावह आहे. या विभागाकडे केवळ ५८ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सद्यस्थितीत सोयाबीनचे एकूण ६५८0 क्विंटल तर कपाशीचे १ लाख १५ हजार ८९६ पाकिटे (प्रति पाकीट ४५0 ग्रॅम) बियाणे बाजारात उपलब्ध झाले. (प्रतिनिधी)