शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

प्रेमात ‘रिचार्ज’साठी झाली कुरबूर; तिने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले!

By प्रदीप भाकरे | Updated: May 19, 2023 17:32 IST

Amravati News प्रेमात मोबाईल रिचार्जवरून कुरबुर झाल्याने युवतीने थेट टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून दिले. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला

प्रदीप भाकरे अमरावती: प्रेमात मोबाईल रिचार्जवरून कुरबुर झाल्याने युवतीने थेट टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून दिले. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तर, १९ मे रोजी त्याला अटक देखील करण्यात आली. अर्पित बाबुराव गुबरे (२३, रा. शिरजगाव बंड, ता. चांदूरबाजार) असे अटक आरोपीचे नाव आहे.

             चांदूरबाजार तालुक्यातील एका गावची मुळ रहिवासी असलेली व सध्या गोपालनगरमध्ये भाडयाच्या खोलीत राहणाऱ्या २० वर्षीय तरूणीने १७ मे रोजी रात्री अमरावती मुंबई रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून १८ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास अर्पितविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अर्पितनेच आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे. दरम्यान, राजापेठ पोलिसांनी आरोपीला शिरजगाव बंड येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आपण तिच्याशी लग्न केले होते, असे बयान अर्पितने दिले आहे, तर त्याने तिच्याशी लग्न केले नसल्याचा मृताच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.शेवटचा फोन अर्पितलाराजापेठ पोलिसांनी अंबा मंगलम कार्यालयासमोरच्या रेल्वे ट्रॅकवरून मृत तरूणीचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यात शेवटचा कॉल अर्पितचा असल्याचे लक्षात आले. घटनेवेळी तो अमरावतीत नव्हता. मोबाईल रिचार्जसाठी तिचा कॉल आला होता. मात्र, आपण सध्या कामात आहोत, नंतर टाकतो, असे तिला बजावले. त्यावर आमच्यात वाद झाला. त्यातून तिने टोकाचा निर्णय घेतला असावा, असे बयान अर्पितने दिले आहे.दोघांमध्ये उत्कट प्रेमआरोपी व तरूणी एकाच तालुक्यातील रहिवासी. मृत तरूणी व अर्पित यांच्यात बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. उत्तरोत्तर ते वाढत गेले. ती आरोपीच्या घरी देखील पोहोचली होती. दरम्यान, ३ जानेवारी २०२२ रोजी अर्पित तिला प्रेमप्रकरणातून पळवून घेऊन गेला. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर दोघेही अमरावतीला सोबत राहत होते. मात्र, अर्पितनुसार, काही दिवसांपुर्वी दोघात कुरबुरी झाल्याने ती गोपालनगर भागात भाडयाने राहायची. तर तो शिरजगाव ते अमरावती अपडाऊन करायचा. घटनेच्या दिवशी तो गावला होता. मात्र, रिचार्जवरून त्यांच्यात वाद झाला.मृत तरूणी व आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानेच आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी केली. त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली.मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ

टॅग्स :Deathमृत्यू