शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

श्रीक्षेत्र झुंज येथे अद्यापही नाही सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

पुरातन शिवलिंग व महानुभवांची समाधी असल्याने श्रावण मास, महाशिवरात्रीला भाविकांची येथे वर्धा नदीपात्रालगत मोठी गर्दी असते. जून ते डिसेंबर ...

पुरातन शिवलिंग व महानुभवांची समाधी असल्याने श्रावण मास, महाशिवरात्रीला भाविकांची येथे वर्धा नदीपात्रालगत मोठी गर्दी असते. जून ते डिसेंबर महिन्यापर्यंत हे विलोभनीय दृश्य पाहण्याकरिता धबधबे पाहण्याकरिता पर्यटकांची मोठी गर्दी असते, शिवाय वर्धा नदीचा २०० फूट रुंदीचा पसारा आहे. नदीतील पाण्याची खोली ३० ते ३५ फूट आहे. पर्यटकांना धबधब्याजवळ सहज जाता येते. कुणी पोहण्याचा तर कुणी सेल्फीचा आनंद घेतात. येथे अप्रिय घटना सदोदित घडत असतात. शिवमंदिराच्या बाजूची कडा खचलेल्या आहेत. यामुळे निदान श्रावण महिन्यात, ज्यावेळी नदी दुथडी भरून वाहत असते, येथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मासेमार डोंग्याचा वापर करून नदीत मासेमारी करतात आणि डोंगा बांधून निघून जातात. या हलगर्जीची दखल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

-----------------

पंढरी मध्यम प्रकल्पावर गर्दी, प्रतिबंधात्मक फलक लावण्याची मागणी - A - A

पुसला : नजीकच्या पंढरी मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जलाशय बघण्याकरीता तालुक्यातील नागरिकांची गर्दी वाढली. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नाही. श्रीक्षेत्र झुंज येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून येथे प्रतिबंधात्मक फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वरूड तालुक्यातील वर्धाडायव्हर्शन अंतर्गत येणाऱ्या पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, गेट लागण्याच्या प्रतीक्षेत आहे. सतत पावसाने या प्रकल्पात अथांग जलाशय साचल्याने प्रकल्प बघण्याकरिता नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. या प्रकल्पात शेतजमिनी गेल्याने काही ठिकाणी विहिरी आहेत. त्यावर पाणी भरल्याने अशा ठिकाणी पोहणाऱ्यांना खोलीचा अंदाज येत नाही. पर्यटक प्रकल्पाच्या भिंतीवर चढून हा जलाशय न्याहाळतात. परंतु या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने पर्यटकाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे प्रतिबंधात्मक फलक लावण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.