शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

सात महिन्यांत शासनाकडून रुपयाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:29 IST

शासनाकडून निधी आणि मार्गदर्शनाबाबत होणाºया दिरंगाईमुळे मागील सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत एक दमडीचाही निधी आलेला नाही. जो अखर्चित आहे, त्यालाही खर्चाची मान्यता देण्याची तत्परता शासनाने दाखवलेली नाही.

ठळक मुद्देझेडपीची स्थिती : अखर्चित निधीलाही मान्यता नसल्याने विकासकामे ठप्प

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाकडून निधी आणि मार्गदर्शनाबाबत होणाºया दिरंगाईमुळे मागील सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत एक दमडीचाही निधी आलेला नाही. जो अखर्चित आहे, त्यालाही खर्चाची मान्यता देण्याची तत्परता शासनाने दाखवलेली नाही. निधी नसल्याने सदस्य आणि ठेकेदारांना तोंड देताना पदाधिकारी, अधिकाºयांची पंचाईत होत आहे. निधीअभावी जिल्हा परिषद अंतर्गत होणारी विकासकामे ठप्प झाली आहेत.विकासकामांतील ३० टक्के निधीची कपात, अखर्चित रक्कम परत मागवली. जीएमटीसह निविदा काढण्यासाठी पूर्वीची निविदा रद्द, खर्चास मान्यता देण्यातील प्रशासकीय दिरंगाई, डीपीडीसीला निधी वाटपाचे आदेश न देणे, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांच्या निधी खर्चास मान्यात न देणे, बांधकाम, जनसुविधा पेयजल योजनांसाठी केंद्राच्या हिश्श्याची लावलेली आडकाठी या सर्वांमुळे जिल्हा परिषदेचा दरवर्षीप्रमाणे मंजूर असतानाही निधी मिळालेला नाही. ३० टक्क््यांच्या नियमामुळे ३०० कोटींपैकी २०० कोटींपर्यंत विकास निधी मिळण्याची शक्यता आहे.सत्ताधारी हतबलअखर्चित रक्कम मात्र ३० कोटींवर परत मागवून घेतली असून, त्याच्या फेरखर्चाची मागणी जिल्हा परिषदेने करूनही याची दखल घेतलेली नाही. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांची तसेच अपंग कल्याण योजनेंतर्गत करावयाच्या खर्चात फेरमान्यता देण्याचाही विषय प्रलंबित आहे. परिणामी मान्यतेअभावी कामे अडकून पडली आहेत.रस्त्याच्या बाबतीतही निधी मागणी करुन एक दमडीही दिलेली नाही. डीपीसीकडून जो निधी मंजूर आहेत. पण त्यातील निधीसुद्धा मिळत नाही, तर काही निधी खर्चासाठी शासनाचे आदेशच नसल्यामुळे पडून आहे. एकंदरीत जिल्हा परिषदेत निधी नाही अन् कामेही नसल्याने सदस्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे नागरिकांच्या रोषाला पदाधिकाºयांना बळी पडावे लागत आहे.केवळ चर्चा : पदाधिकाऱ्यांची व्यथाजिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन आठ महिने झाले आहेत. सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यापलीकडे सदस्यांना मतदारसंघात एक रुपयाचेही काम अजून करता आलेले नाही. जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होऊन दोन ते तीन महिने होत आले तरीही अजून बैठक झालेली नसल्यामुळे निधी मंजुरी प्रकरणे अडकून पडली आहेत. ठेकेदारांची बिले अडकली आहेत. सदस्यांवर मतदारसंघातून दबाव येत असल्याने ते पदाधिकाऱ्यांसमोर येऊन आपली व्यथा मांडत आहेत.