शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

तुरीची खरेदी, चुकारे अन् अनुदानही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:18 IST

तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले व आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. प्रत्यक्षात एक महिना होऊनसुद्धा घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत.

ठळक मुद्देबबलू देशमुख आक्रमक : जिल्हा काँग्रेस कमिटीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले व आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. प्रत्यक्षात एक महिना होऊनसुद्धा घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकरी अडचणीत सापडले आहे.शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात बबलू देशमुख यांनी दंड थोपाटले आहे. तत्काळ चुकारे अन् अनुदान न दिल्यास जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शासनाला दिला आहे.कर्जमाफीच्या घोळात शेतकरी गारद झाला असताना एक वर्षानंतरही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आजही कर्जाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील ५० ते ६० हजार शेतकरी आहे. गतवर्षी तुरीचे चांगले उत्पन्न झाले होते. त्यामुळे कर्जाची परतफेड होर्ईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना शासकीय खरेदीही बंद करण्यात आली आहे. तसेच खासगी बाजारात शेतकऱ्यांची सुमार लूट केली जात आहे. शेतकऱ्यांचा रोष घालवण्यासाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले. परंतु, याला एक महिन्याचा कालावधी उलटला असताना अनुदान अद्याप मिळालेले नाही, असा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे.बोंडअळीची मदतदेखील अर्ध्याअधिक शेतकऱ्यांना मिळाला नाही. पीकविम्याची भरपाईतही ६२ हजार शेतकरी डावलले. शेतकऱ्यांची लुबाडणूक करून कंपनीचे पोट भरण्याचा गोरखधंदा चालविला आहे. शेतकऱ्यांच्याच टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार भाजप सरकारने सुरू केला असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला. तुरीचे अनुदान दोन दिवसांत जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :congressकाँग्रेस