शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

...तिथे कुणीही केली नाही रंगांची उधळण !

By admin | Updated: March 8, 2015 00:14 IST

संत परशराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदवासीयांनी यंदाही रंगपंचमी उत्सवाला फाटा दिला. यादिवशी येथे कुणीची रंगपंचमी साजरी केली नाही.

अनंत बोबडे येवदासंत परशराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदवासीयांनी यंदाही रंगपंचमी उत्सवाला फाटा दिला. यादिवशी येथे कुणीची रंगपंचमी साजरी केली नाही. भागवत कथायज्ञासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हे गाव जिल्ह्यातील रंगपंचमी उत्सव न साजरे करणारे गाव ठरले आहे.पिंपळोदवासीयांना अनेक पद्धतीने साक्षात्कार देत असलेले परशराम महाराज होळीच्या दिवशी निघून गेल्याने ६४ वर्षांपासून या गावात होळी व रंगपंचमी आजही खेळली जात नाही. महाराजांनी जाता-जाता पिंपळोदवासीयांना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकप्रकारचा धडाच दिला. महाराष्ट्रभर एकीकडे होळी व रंगपंचमीला हजारो झाडांची वृक्षतोड आणि होळीनिमित्त पेटविली जाणारी लाकडे व त्यामधून निघणारा विषारी धूर. मौल्यवान पाण्याचा अपव्यय महाराष्ट्रातील अनेक भागांत रंगपंचमीला आढळतो. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजन या रंगपंचमीच्या आनंदात सहभागी होतात. परंतु गत ६४ वर्षांपासून पिंपळोदवासियांनी होळी व रंगोत्सव महाराजांच्या मृत्यूमुळे साजरा करीत नाही. महाराजांच्या सन्मानार्थ घ—तलेला हा निर्णय अर्थात् वाढत्या प्रदूषणावर होणाऱ्या अतोनात खर्चावर एक प्रकारे अंकुशच म्हणावा लागेल. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गावाची मोलाची भूमिका आहे. गावकऱ्यांनी महाराजांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त यंदाही संगीतमय भागवत ज्ञानयज्ञसप्ताहाचे आयोजन केले होते. यात वाणीभूषण सु.श्री. वैभवीश्री यांच्या ओजस्वी वाणीतून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजेश वाघझाडे यांच्या सहकार्यातून या परिसरातील नागरिकांसाठी भागवत सप्ताह, आर्ट आॅफ लिव्हींग शिबिर तसेच सुदर्शन क्रीया, ध्यान साधना, आत्मशांती, कार्यसिध्दी, ताणतणाव यापासून मुक्ती मिळविण्यासाठी असे कार्यक्रम घेण्यात आले.