अनंत बोबडे येवदासंत परशराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदवासीयांनी यंदाही रंगपंचमी उत्सवाला फाटा दिला. यादिवशी येथे कुणीची रंगपंचमी साजरी केली नाही. भागवत कथायज्ञासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हे गाव जिल्ह्यातील रंगपंचमी उत्सव न साजरे करणारे गाव ठरले आहे.पिंपळोदवासीयांना अनेक पद्धतीने साक्षात्कार देत असलेले परशराम महाराज होळीच्या दिवशी निघून गेल्याने ६४ वर्षांपासून या गावात होळी व रंगपंचमी आजही खेळली जात नाही. महाराजांनी जाता-जाता पिंपळोदवासीयांना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकप्रकारचा धडाच दिला. महाराष्ट्रभर एकीकडे होळी व रंगपंचमीला हजारो झाडांची वृक्षतोड आणि होळीनिमित्त पेटविली जाणारी लाकडे व त्यामधून निघणारा विषारी धूर. मौल्यवान पाण्याचा अपव्यय महाराष्ट्रातील अनेक भागांत रंगपंचमीला आढळतो. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजन या रंगपंचमीच्या आनंदात सहभागी होतात. परंतु गत ६४ वर्षांपासून पिंपळोदवासियांनी होळी व रंगोत्सव महाराजांच्या मृत्यूमुळे साजरा करीत नाही. महाराजांच्या सन्मानार्थ घ—तलेला हा निर्णय अर्थात् वाढत्या प्रदूषणावर होणाऱ्या अतोनात खर्चावर एक प्रकारे अंकुशच म्हणावा लागेल. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गावाची मोलाची भूमिका आहे. गावकऱ्यांनी महाराजांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त यंदाही संगीतमय भागवत ज्ञानयज्ञसप्ताहाचे आयोजन केले होते. यात वाणीभूषण सु.श्री. वैभवीश्री यांच्या ओजस्वी वाणीतून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजेश वाघझाडे यांच्या सहकार्यातून या परिसरातील नागरिकांसाठी भागवत सप्ताह, आर्ट आॅफ लिव्हींग शिबिर तसेच सुदर्शन क्रीया, ध्यान साधना, आत्मशांती, कार्यसिध्दी, ताणतणाव यापासून मुक्ती मिळविण्यासाठी असे कार्यक्रम घेण्यात आले.
...तिथे कुणीही केली नाही रंगांची उधळण !
By admin | Updated: March 8, 2015 00:14 IST