शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रिद्धपूर येथे परप्रांतीय नागरिकांची तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दाखल झालेल्या देश-विदेशातील नागरिकांनी ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर तपासणी करून घेतली अथवा नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देगावाला पोलीस छावणीचे स्वरूप : देवेंद्र भुयार यांनी गाठले रिद्धपूर, प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्करिद्धपूर/मोर्शी : तालुक्यातील रिद्धपूर येथे देश-विदेशातून आलेल्या सुमारे ७० ते ७५ नागरिकांची तपासणी झाली नसल्याने महसूल व आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. पणिामीे बुधवारी रिद्धपूर येथे एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी वेढल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी रिद्धपूर गाठून महसूल विभाग, आरोग्य, पोलीस प्रशासन, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच आमदार भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली.कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दाखल झालेल्या देश-विदेशातील नागरिकांनी ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर तपासणी करून घेतली अथवा नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे जिल्हाबाहेरील १०८, इतर राज्यातून २७ आणि विदेशातील एक नागरिक गावात दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. आमदार भुयार हे सकाळी १० वाजतापासूनच गावात ठाण मांडून होते. त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून बाहेरील नागरिकांची तपासणी करून हातावर ‘होम क्वारंटाइन’ शिक्के मारण्याची प्रक्रिया राबवून घेतली. हल्ली हे नागरिक ‘होम क्वारंटाइन’ असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मोर्शी ग्रामीण परिसरात एकूण १४९७ नागरिक जिल्ह्याबाहेरील दाखल झाले असून, त्यांच्यावर गठित गावनिहाय समिती लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणू रोगाने देशभरात थैमान घातले आहे. प्रशासनाकडून नाकाबंदीनंतरही देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्शी, वरूड तालुक्यांतील गावांमध्ये दाखल होणे ही चिंतनीय बाब आहे. आता हातावर शिक्के असलेल्यांवर आरोग्य विभाग , महसूल विभाग, पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर करडी नजर ठेवणे काळाची गरज आहे. विशेषत: आरोग्य विभागाने काळजी घेत ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करू नये. ‘होम क्वारंटाइन’ असलेल्यांना घरातच थांबवावे, घराबाहेर प्रशासनाने पडू देऊ नये, असे निर्देश आमदार भुयार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस