शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

रिद्धपूर येथे परप्रांतीय नागरिकांची तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दाखल झालेल्या देश-विदेशातील नागरिकांनी ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर तपासणी करून घेतली अथवा नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देगावाला पोलीस छावणीचे स्वरूप : देवेंद्र भुयार यांनी गाठले रिद्धपूर, प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्करिद्धपूर/मोर्शी : तालुक्यातील रिद्धपूर येथे देश-विदेशातून आलेल्या सुमारे ७० ते ७५ नागरिकांची तपासणी झाली नसल्याने महसूल व आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. पणिामीे बुधवारी रिद्धपूर येथे एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी वेढल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी रिद्धपूर गाठून महसूल विभाग, आरोग्य, पोलीस प्रशासन, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच आमदार भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली.कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दाखल झालेल्या देश-विदेशातील नागरिकांनी ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर तपासणी करून घेतली अथवा नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे जिल्हाबाहेरील १०८, इतर राज्यातून २७ आणि विदेशातील एक नागरिक गावात दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. आमदार भुयार हे सकाळी १० वाजतापासूनच गावात ठाण मांडून होते. त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून बाहेरील नागरिकांची तपासणी करून हातावर ‘होम क्वारंटाइन’ शिक्के मारण्याची प्रक्रिया राबवून घेतली. हल्ली हे नागरिक ‘होम क्वारंटाइन’ असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मोर्शी ग्रामीण परिसरात एकूण १४९७ नागरिक जिल्ह्याबाहेरील दाखल झाले असून, त्यांच्यावर गठित गावनिहाय समिती लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणू रोगाने देशभरात थैमान घातले आहे. प्रशासनाकडून नाकाबंदीनंतरही देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्शी, वरूड तालुक्यांतील गावांमध्ये दाखल होणे ही चिंतनीय बाब आहे. आता हातावर शिक्के असलेल्यांवर आरोग्य विभाग , महसूल विभाग, पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर करडी नजर ठेवणे काळाची गरज आहे. विशेषत: आरोग्य विभागाने काळजी घेत ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करू नये. ‘होम क्वारंटाइन’ असलेल्यांना घरातच थांबवावे, घराबाहेर प्रशासनाने पडू देऊ नये, असे निर्देश आमदार भुयार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस