शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

वनविभागात निधी नाही, वनमजुरांचे वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST

अमरावती : कोरोना संसर्गामुळे शासनाने सर्वच विभागाच्या निधीला कात्री लावली. मात्र, सर्वाधिक फटका सामाजिक वनीकरण विभागाला बसला आहे. सहा ...

अमरावती : कोरोना संसर्गामुळे शासनाने सर्वच विभागाच्या निधीला कात्री लावली. मात्र, सर्वाधिक फटका सामाजिक वनीकरण विभागाला बसला आहे. सहा महिन्यांपासून निधी नसल्यामुळे एकूणच कामे ठप्प आहे. विशेषत: वनमजुरांचे वेतन रखडले असून, मजुरांच्या हाताला रोजगार नाही, असे सर्वदूर चित्र आहे.

रोपवन चौकीदार, फायर प्रोटेक्शन, व्याघ्र प्रकल्पात कॅम्प अंतर्गत कामे, मग्राराेहयोच्या मजुरांचे वेतन प्रलंबित असल्याची माहिती आहे.? सामाजिक वनीकरणाची कामे कोरोना काळात निधीअभावी पूर्णत: ठप्प होती. शासनाने ३३ टक्के अनुदान देण्याचे धोरण अंवलंबविले आहे.? निधी आल्यानंतर मनुष्य दिवसांनुसार प्रलंबित वेतन मजुरांना अदा करण्यात येणार आहे.? ३१ मार्चपूर्वी निधी मिळेल, असे अर्थ खात्याने कळविले आहे.? मात्र, निधी अभावी जंगल क्षेत्र, रोपांचे संगोपन, वन्यजीवांसाठी उपाययोजनांच्या होणाऱ्या कामांवर परिणाम झाला आहे.? रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीचा बोजवारा उडाला आहे.? मजूर नसल्याने रोपांचे संगोपन करणे शक्य नाही, अशी भूमिका वनाधिकाऱ्यांनी घेतली आहे.? सामाजिक वनीकरण, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प असे एकूण जिल्ह्यात २५ हजारांवर मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.? तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील महत्वाकांक्षी योजना ५० कोटी वृक्ष लागवडीतील वृक्ष आता पाण्याअभावी जीवंत ठेवणे कठीण होणार आहे.?

---------------

निधी नाही तर रोपांना पाणी नाही

सामाजिक वनीकरण, वनविभागाने गतवर्षी रोपे लावली आहे. मात्र, जानेवारी सुरू होताच पाण्याअभावी ही रोपे सुकू लागली आहे. रोपांना पाणी देण्यासाठी निधीची तरतूद नाही. त्यामुळे जिवंत रोपे जगविणे फार कठीण होणार आहे. मार्च महिन्यात जिवंत रोपांचे हाल होणार असून, वृक्ष लागवडीचा बोजवारा उडणार आहे.

----------------------

कोट

जेमतेम गुरुवारी निधी प्राप्त झाला आहे. मात्र, हा निधी मजुरांच्या थकीत वेतनावर खर्च केला जाणार आहे. वृक्षांचे संगोपन, रोपांना पाणी देणे यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात जिवंत रोपांचे संगोपन करताना कसरत करावी लागणार आहे.

- नितीन गोंडाणे, प्रभारी उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती