शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धारणीत अग्निशमनवाहनच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:57 IST

सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती, तर झालेले नुकसान टळले असते, अशी भावना भुलोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंगळवारच्या अग्निकल्लोळाने अग्निशमन पथकाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

धारणी : सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती, तर झालेले नुकसान टळले असते, अशी भावना भुलोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंगळवारच्या अग्निकल्लोळाने अग्निशमन पथकाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.चार वर्षांपूर्वी धारणी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायत वा तहसील प्रशासन आता अग्निशमन यंत्रणा उभारेल, अशी भाबडी आशा धारणीकरांना होती. मात्र ती फोल ठरली. धारणी तालुक्यात एकूण १५२ गावे आहेत. त्यातील अनेक गावे दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात मोडतात. मात्र तालुक्यात कुठेही आग लागली की, अचलपूर, चिखलदरा पालिकेची मदत घ्यावी लागते. काही वर्षांपूर्वी सेमाडोह येथे असाच अग्निकल्लोळ उठला होता. आता भुलोरीत २०१३ ची पुनरावृत्ती झाली. त्याअनुषंगाने धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असावी, अशी आदिवासींची मागणी आहे.अग्निशामक पथक पोहोचले चार तासानेदुपारी २ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन वाहन व पथक बोलाविले. ते ९० किमी प्रवास करुन सायंकाळी ६ च्या सुमारास भुलोरी येथे पोहोचले. तत्पूर्वी बºहाणपूर, खंडवा व चिखलदरा येथील पथक पोहोचले.यांची जळाली घरेभुलोरी येथे मंगळवारी लागलेल्या आगीत मनीराम जांभेकर, राधाकिसन मावस्कर, नारायण सज्जुलाल मावस्कर, राजाराम धांडे, कलांसिंग भिलावेकर, धनु कासदेकर, भाऊलाल दहेकर, रामसिंग कासदेकर, बिसराम दहेकर, किशोर भिलावेकर, नामदेव जावरकर, शंकर जावरकर, शालिकराम भिलावेकर, हरिराम दहेकर, मोतीराम सानू, मान्सू भिलावेकर, रमेश सेलेकर, झनकलाल कासदेकर यांची घरे जळाली.