शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत अग्निशमनवाहनच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:57 IST

सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती, तर झालेले नुकसान टळले असते, अशी भावना भुलोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंगळवारच्या अग्निकल्लोळाने अग्निशमन पथकाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

धारणी : सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती, तर झालेले नुकसान टळले असते, अशी भावना भुलोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंगळवारच्या अग्निकल्लोळाने अग्निशमन पथकाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.चार वर्षांपूर्वी धारणी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायत वा तहसील प्रशासन आता अग्निशमन यंत्रणा उभारेल, अशी भाबडी आशा धारणीकरांना होती. मात्र ती फोल ठरली. धारणी तालुक्यात एकूण १५२ गावे आहेत. त्यातील अनेक गावे दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात मोडतात. मात्र तालुक्यात कुठेही आग लागली की, अचलपूर, चिखलदरा पालिकेची मदत घ्यावी लागते. काही वर्षांपूर्वी सेमाडोह येथे असाच अग्निकल्लोळ उठला होता. आता भुलोरीत २०१३ ची पुनरावृत्ती झाली. त्याअनुषंगाने धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असावी, अशी आदिवासींची मागणी आहे.अग्निशामक पथक पोहोचले चार तासानेदुपारी २ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन वाहन व पथक बोलाविले. ते ९० किमी प्रवास करुन सायंकाळी ६ च्या सुमारास भुलोरी येथे पोहोचले. तत्पूर्वी बºहाणपूर, खंडवा व चिखलदरा येथील पथक पोहोचले.यांची जळाली घरेभुलोरी येथे मंगळवारी लागलेल्या आगीत मनीराम जांभेकर, राधाकिसन मावस्कर, नारायण सज्जुलाल मावस्कर, राजाराम धांडे, कलांसिंग भिलावेकर, धनु कासदेकर, भाऊलाल दहेकर, रामसिंग कासदेकर, बिसराम दहेकर, किशोर भिलावेकर, नामदेव जावरकर, शंकर जावरकर, शालिकराम भिलावेकर, हरिराम दहेकर, मोतीराम सानू, मान्सू भिलावेकर, रमेश सेलेकर, झनकलाल कासदेकर यांची घरे जळाली.