शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेला मुदतवाढ नाही

By admin | Updated: July 3, 2014 23:19 IST

हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंतिम तारीख ३० जून होती. मात्र पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्याच न झाल्याने या योजनेला १५ जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव

कृषी विभागाची मागणी : १५ दिवसांची मुदत द्याअमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंतिम तारीख ३० जून होती. मात्र पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्याच न झाल्याने या योजनेला १५ जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव कृषी विभागाने कृषी आयुक्त कार्यालयाला पाठविला. तसेच या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी कृषी मंत्र्यांकडे केली होती. परंतु या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याने अनेकांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागल्याचे चित्र आहे. पावसाचा लहरीपणा व नैसर्गिक आपत्ती यापासून शेती पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची होती. जिल्ह्यात खरिपाची पेरणीच झाली नसल्याने या योजनेला किमान १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने कृषी आयुक्त कार्यालयात पाठविला. मात्र मुदत वाढ देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेच्या अंतिम दिवशी ३० जून रोजी तलाठी संघाचे लेखणीबंद आंदोलन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी सातबारा उताऱ्यासह पेरेपत्रक व अन्य कागदपत्रे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकाचा या योजनेत समावेश होता. मात्र खरिपाची पेरणी झाली नसल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला नव्हता. योजनेला अत्यल्प प्रतिसाद असल्याने पेरणीपूर्व देखील पीक विमा काढता येतो. पीक पेरणी बदलल्यास बँकेला व कृषी विभागाला माहिती कळवावी लागणार असे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी गर्दी केली होती. मात्र, अंतिम दिवशी तलाठ्यांचे लेखणीबंद आंदोलन असल्याने शेकडो शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले. (प्रतिनिधी)