शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पीक विमा योजनेला मुदतवाढ नाही

By admin | Updated: July 3, 2014 23:19 IST

हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंतिम तारीख ३० जून होती. मात्र पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्याच न झाल्याने या योजनेला १५ जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव

कृषी विभागाची मागणी : १५ दिवसांची मुदत द्याअमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंतिम तारीख ३० जून होती. मात्र पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्याच न झाल्याने या योजनेला १५ जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव कृषी विभागाने कृषी आयुक्त कार्यालयाला पाठविला. तसेच या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी कृषी मंत्र्यांकडे केली होती. परंतु या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याने अनेकांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागल्याचे चित्र आहे. पावसाचा लहरीपणा व नैसर्गिक आपत्ती यापासून शेती पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची होती. जिल्ह्यात खरिपाची पेरणीच झाली नसल्याने या योजनेला किमान १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने कृषी आयुक्त कार्यालयात पाठविला. मात्र मुदत वाढ देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेच्या अंतिम दिवशी ३० जून रोजी तलाठी संघाचे लेखणीबंद आंदोलन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी सातबारा उताऱ्यासह पेरेपत्रक व अन्य कागदपत्रे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकाचा या योजनेत समावेश होता. मात्र खरिपाची पेरणी झाली नसल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला नव्हता. योजनेला अत्यल्प प्रतिसाद असल्याने पेरणीपूर्व देखील पीक विमा काढता येतो. पीक पेरणी बदलल्यास बँकेला व कृषी विभागाला माहिती कळवावी लागणार असे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी गर्दी केली होती. मात्र, अंतिम दिवशी तलाठ्यांचे लेखणीबंद आंदोलन असल्याने शेकडो शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले. (प्रतिनिधी)