शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

विद्यापीठात सफाई कंत्राटात ई-निविदा नाही

By admin | Updated: April 8, 2017 00:14 IST

तीन लाखांच्यावरील व्यवहार करताना ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे.

कुलगुरुंचे निर्णय गुंडाळले : पाच एप्रिल रोजी निविदा सूचना जारीअमरावती : तीन लाखांच्यावरील व्यवहार करताना ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. तथापि बुधवारी ५ एप्रिल रोजी विद्यापीठ परिसरातील स्वच्छता व साफसफाई कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा सूचना काढली आहे. मात्र हा कंत्राट ई- निविदेद्वारे सोपविला जाणार नाही, हे विशेष.राज्य शासनाच्या निर्णयानुसार तीन लाखांच्यावरील कोणत्याही व्यवहारासाठी ई-निविदा आवश्यक आहे. मात्र दीड वर्षाचा कालावधी लोटला असताना विद्यापीठ प्रशासन वेबपोर्टलवर निविदा प्रकाशित करून मर्जीतील अथवा जवळील व्यक्तींकडे कंत्राट सोपवितात, असा कारभार सुरु आहे. परंतु या परंपरागत पद्धतीला फाटा देत ई-निविदा प्रक्रियेतूनच तीन लाखांच्यावरील व्यवहार होतील, असे स्वत: कुलगुरुंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी स्पष्ट केले. मात्र एक दिवसापूर्वीच बुधवारी ई-निविदेविनाच सफाई, स्वच्छतेबाबतच्या निविदा बोलाविल्या आहेत. यामध्ये एक वर्षाच्या सफाई कंत्राटाकरिता अनामत रक्कम भरण्यापासून सूट असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र, मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे निपटारा प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वित्तीय संपन्नतेचा पुरावा आदी अनिवार्य करण्यात आले आहे. या कंत्राटासाठी विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागात बंद लिफाफ्यात २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निविदा स्वीकारण्यात येतील. २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता निविदा धारकांसमोर निविदा समिती याबाबत निर्णय घेणार आहे. परंतु स्वच्छता व सफाईचा खर्च हा वर्षाकाठी लाखोंचा असताना ई-निविदा का मागविल्या नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वी परीक्षेशी संबंधित आॅनलाईन ‘एन्ड टू एन्ड’ या कामांसाठी देखील विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर निविदा मागविण्याचा प्रताप करण्यात आला होता. परिणामी ११० दिवसांनंतरही परीक्षेचे आॅनलाईन निकाल विद्यापीठाला लावता आले नाही. कुलगुरुंनी तीन लाखांच्यावरील व्यवहारासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असताना प्रशासन मात्र कुलगुरुंच्याही निर्णयाला जुमानत नाही, असे दिसून येते. विद्यापीठात दीड वर्षांपासून ई-निविदेसाठी यंत्रणा उभारता आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)