शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात सफाई कंत्राटात ई-निविदा नाही

By admin | Updated: April 8, 2017 00:14 IST

तीन लाखांच्यावरील व्यवहार करताना ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे.

कुलगुरुंचे निर्णय गुंडाळले : पाच एप्रिल रोजी निविदा सूचना जारीअमरावती : तीन लाखांच्यावरील व्यवहार करताना ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. तथापि बुधवारी ५ एप्रिल रोजी विद्यापीठ परिसरातील स्वच्छता व साफसफाई कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा सूचना काढली आहे. मात्र हा कंत्राट ई- निविदेद्वारे सोपविला जाणार नाही, हे विशेष.राज्य शासनाच्या निर्णयानुसार तीन लाखांच्यावरील कोणत्याही व्यवहारासाठी ई-निविदा आवश्यक आहे. मात्र दीड वर्षाचा कालावधी लोटला असताना विद्यापीठ प्रशासन वेबपोर्टलवर निविदा प्रकाशित करून मर्जीतील अथवा जवळील व्यक्तींकडे कंत्राट सोपवितात, असा कारभार सुरु आहे. परंतु या परंपरागत पद्धतीला फाटा देत ई-निविदा प्रक्रियेतूनच तीन लाखांच्यावरील व्यवहार होतील, असे स्वत: कुलगुरुंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी स्पष्ट केले. मात्र एक दिवसापूर्वीच बुधवारी ई-निविदेविनाच सफाई, स्वच्छतेबाबतच्या निविदा बोलाविल्या आहेत. यामध्ये एक वर्षाच्या सफाई कंत्राटाकरिता अनामत रक्कम भरण्यापासून सूट असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र, मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे निपटारा प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वित्तीय संपन्नतेचा पुरावा आदी अनिवार्य करण्यात आले आहे. या कंत्राटासाठी विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागात बंद लिफाफ्यात २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निविदा स्वीकारण्यात येतील. २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता निविदा धारकांसमोर निविदा समिती याबाबत निर्णय घेणार आहे. परंतु स्वच्छता व सफाईचा खर्च हा वर्षाकाठी लाखोंचा असताना ई-निविदा का मागविल्या नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वी परीक्षेशी संबंधित आॅनलाईन ‘एन्ड टू एन्ड’ या कामांसाठी देखील विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर निविदा मागविण्याचा प्रताप करण्यात आला होता. परिणामी ११० दिवसांनंतरही परीक्षेचे आॅनलाईन निकाल विद्यापीठाला लावता आले नाही. कुलगुरुंनी तीन लाखांच्यावरील व्यवहारासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असताना प्रशासन मात्र कुलगुरुंच्याही निर्णयाला जुमानत नाही, असे दिसून येते. विद्यापीठात दीड वर्षांपासून ई-निविदेसाठी यंत्रणा उभारता आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)