शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

घरी बोअरवेल आहे काय? ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:39 IST

शहरात बोअरवेलची संख्या अनिर्बंध वाढून अमर्याद उपसा सुरू असल्याने भूजलस्तर कमालीचे घटले आहे. यासाठी ज्या घरी बोअर आहेत, त्यांना आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचे निर्देश : मजीप्रा नळ देयकांसोबत देणार नागरिकांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात बोअरवेलची संख्या अनिर्बंध वाढून अमर्याद उपसा सुरू असल्याने भूजलस्तर कमालीचे घटले आहे. यासाठी ज्या घरी बोअर आहेत, त्यांना आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे. नळाच्या पुढील देयकासोबत याविषयीची नोटीस आता ज्या घरी बोअर आहेत, त्यांना बजावली जाणार आहे.शहरात पाणीटंचाई नाही, याचा अर्थ असाही नाही की, पाण्याचा अनिर्बंध वापर करावा. मजीप्राद्वारे शहराला पाणीपुरवठा होत आहे. या प्रक्रियेत पिण्याच्या पाण्याचा वापर नागरिक रस्त्यावर टाकण्यासाठी, गाड्या धुणे व इतर कामांसाठीही करीत आहेत. शहरातील बहुतांश नागरिकांच्या घरी नळाव्यतिरिक्त बोअरवेलदेखील आहेत. त्याद्वारे भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत भूजल पुनर्भरण होत नसल्याने दिवसेंदिवस शहराची भूजल पातळी खोल जात आहे. यावर उपाययोजना म्हणून भूजलस्तरात वाढ होण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्डा या मुद्द्यावर महापालिका आयुक्त संजय निपाणे आग्रही आहेत. त्यांनी याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दोन वेळा पत्र बजावले. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा या नात्याने शहरात ज्या नागरिकांच्या घरी बोअरवेल आहे, त्यांना शास्त्रीय पद्धतीने शोषखड्डा व रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बंधनकारक करावी. त्यासाठी नळाचे देयकासोबत संबंधित नागरिकांना याविषयीची नोटीस बजावण्यात यावी व मजीप्रा स्तरावरूनही कारवाई व्हावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.भूजल पुनर्भरणसाठी १२२४ ठिकाणी उपाययोजनाशहरात एका महिन्याच्या अवधीत १२२४ ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आयुक्त संजय निपाणे यांनी सर्वप्रथम स्वत:च्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले होते. यानंतर एक महिन्याच्या अवधीत ५२ अधिकारी व २६४ कर्मचाऱ्यांनी घरी तसेच महापालिकेच्या आठ कार्यालयांत ही यंत्रणा उभारली. ९० उद्याने, ४० बगीचे, महापालिकेच्या रस्त्याचे बाजूला कंत्रादारामार्फत १३ ठिकाणी शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्रेडाईमार्फत महापालिका हद्दीतील १९२ सदनिकांत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या ३० शाळा, ३० दवाखाने तसेच २१७ नागरिक व इतर सहभागातून ५१० तसेच ५६ आरओ प्लांटमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली. हा जलजागृतीचा परिणाम आहे.रस्ता बांधकामाच्या २०० मीटर अंतरात शोषखड्डाशहराची भूजलपातळी घटल्याने सिमेंट रस्त्यावरून वाहत जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी आता रस्त्याच्या २०० ते ३०० मीटर अंतरात शोषखड्डा तयार केला जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत पत्र देण्यात आले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत भूजलस्तर दिवसेंदिवस खालावत जात आहे. त्यामुळे सामूहिक व्यवस्थापन व नियोजन अगत्याची असल्याची बाब उपायुक्तांनी स्पष्ट केली.

टॅग्स :Rainपाऊस