शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

...तर विद्यापीठांचे कामकाज बंद पाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 16:35 IST

तीनही शिखर संघटना एकवटल्या : ३० टक्के कपात धोरणावर उच्च व तंत्र विभागाचा आक्षेप

अमरावती : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठांचा आढावा घेऊन पदांचे आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून ३० टक्के पदे कपात करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अत्यंत विपरीत परिणाम विद्यापीठांच्या कामकाजावर होणार आहे. सरकारने पद कपातीचे धोरण मागे न घेतल्यास सर्व अकृषी विद्यापीठ तीव्र आंदोलनासह बंद पाडू, असा निर्धार कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.

अकृषी विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची मुंबई येथे शनिवारी संयुक्त बैठक झाली. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, हे विशेष. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, कार्याध्यक्ष अजय देशमुख, मागासवर्गीय महासंघाचे अध्यक्ष•नितीन कोळी, सचिव दीपक मोरे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज आॅफिसर्स फोरमचे सचिव दिनेश कांबळे,•दीपक वसावे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे प्रभारी अध्यक्ष अभय राणे, सरचिटणीस रूपेश मालुसरे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी कल्याणकारी समितीचे अध्यक्ष अविनाश तांबे हे उपस्थित होते.

शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील विविध विभागांचा आढावा घेऊन पदांचे आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून ३० टक्के पदे कपात करण्याचे निर्देश•२९ जून, २०१७ च्या शासन निर्णयान्वये दिले आहे. वास्तविक हे निर्देश ज्या विभागांनी पदनिर्मितीसाठी निकष, कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्त्वे ठरविलेली नाहीत, त्या शासकीय विभागांसाठी आहेत. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील अकृषी विद्यापीठांसाठी हे निकष व कार्यप्रणाली ६ जुलै, २००९ रोजी निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या आधारे पदनिर्मिती करण्याचे ठरविण्यात आले असून, त्याचवेळी प्रत्येक विद्यापीठांची १८ ते २८ टक्के पदे कपात केली.

परंतु, शासन निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाºयांच्या पदांमध्ये ३० टक्के कपात करण्याचा घाट उच्च शिक्षण संचालनालय व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील काही उच्चपदस्थ अधिकाºयांचा असल्याचा आक्षेप घेण्यात आला. मात्र, या निर्णयाविरूद्ध तीनही शिखर संघटना एकवटल्या आहेत. महासंघ मिळून राज्यस्तरीय कृती समिती गठित करण्यात आली आहे.

 

उच्च शिक्षण संचालनालय विद्यापीठे व मंत्रालय यात समन्वयक म्हणून भूमिका पार पाडण्याऐवजी हटवादी भूमिका घेऊन मंत्रालयाची दिशाभूल करीत आहे. विद्यापीठे सक्षम करण्याऐवजी विद्यापीठांचे पंख छाटण्याचा हा प्रकार आहे.- अजय देशमुख,अध्यक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटना

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ