शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

...तर विद्यापीठांचे कामकाज बंद पाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 16:35 IST

तीनही शिखर संघटना एकवटल्या : ३० टक्के कपात धोरणावर उच्च व तंत्र विभागाचा आक्षेप

अमरावती : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठांचा आढावा घेऊन पदांचे आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून ३० टक्के पदे कपात करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अत्यंत विपरीत परिणाम विद्यापीठांच्या कामकाजावर होणार आहे. सरकारने पद कपातीचे धोरण मागे न घेतल्यास सर्व अकृषी विद्यापीठ तीव्र आंदोलनासह बंद पाडू, असा निर्धार कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.

अकृषी विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची मुंबई येथे शनिवारी संयुक्त बैठक झाली. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, हे विशेष. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, कार्याध्यक्ष अजय देशमुख, मागासवर्गीय महासंघाचे अध्यक्ष•नितीन कोळी, सचिव दीपक मोरे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज आॅफिसर्स फोरमचे सचिव दिनेश कांबळे,•दीपक वसावे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे प्रभारी अध्यक्ष अभय राणे, सरचिटणीस रूपेश मालुसरे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी कल्याणकारी समितीचे अध्यक्ष अविनाश तांबे हे उपस्थित होते.

शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील विविध विभागांचा आढावा घेऊन पदांचे आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून ३० टक्के पदे कपात करण्याचे निर्देश•२९ जून, २०१७ च्या शासन निर्णयान्वये दिले आहे. वास्तविक हे निर्देश ज्या विभागांनी पदनिर्मितीसाठी निकष, कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्त्वे ठरविलेली नाहीत, त्या शासकीय विभागांसाठी आहेत. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील अकृषी विद्यापीठांसाठी हे निकष व कार्यप्रणाली ६ जुलै, २००९ रोजी निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या आधारे पदनिर्मिती करण्याचे ठरविण्यात आले असून, त्याचवेळी प्रत्येक विद्यापीठांची १८ ते २८ टक्के पदे कपात केली.

परंतु, शासन निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाºयांच्या पदांमध्ये ३० टक्के कपात करण्याचा घाट उच्च शिक्षण संचालनालय व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील काही उच्चपदस्थ अधिकाºयांचा असल्याचा आक्षेप घेण्यात आला. मात्र, या निर्णयाविरूद्ध तीनही शिखर संघटना एकवटल्या आहेत. महासंघ मिळून राज्यस्तरीय कृती समिती गठित करण्यात आली आहे.

 

उच्च शिक्षण संचालनालय विद्यापीठे व मंत्रालय यात समन्वयक म्हणून भूमिका पार पाडण्याऐवजी हटवादी भूमिका घेऊन मंत्रालयाची दिशाभूल करीत आहे. विद्यापीठे सक्षम करण्याऐवजी विद्यापीठांचे पंख छाटण्याचा हा प्रकार आहे.- अजय देशमुख,अध्यक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटना

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ