शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...तर विद्यापीठांचे कामकाज बंद पाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 16:35 IST

तीनही शिखर संघटना एकवटल्या : ३० टक्के कपात धोरणावर उच्च व तंत्र विभागाचा आक्षेप

अमरावती : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठांचा आढावा घेऊन पदांचे आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून ३० टक्के पदे कपात करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अत्यंत विपरीत परिणाम विद्यापीठांच्या कामकाजावर होणार आहे. सरकारने पद कपातीचे धोरण मागे न घेतल्यास सर्व अकृषी विद्यापीठ तीव्र आंदोलनासह बंद पाडू, असा निर्धार कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.

अकृषी विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची मुंबई येथे शनिवारी संयुक्त बैठक झाली. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, हे विशेष. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, कार्याध्यक्ष अजय देशमुख, मागासवर्गीय महासंघाचे अध्यक्ष•नितीन कोळी, सचिव दीपक मोरे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज आॅफिसर्स फोरमचे सचिव दिनेश कांबळे,•दीपक वसावे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे प्रभारी अध्यक्ष अभय राणे, सरचिटणीस रूपेश मालुसरे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी कल्याणकारी समितीचे अध्यक्ष अविनाश तांबे हे उपस्थित होते.

शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील विविध विभागांचा आढावा घेऊन पदांचे आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून ३० टक्के पदे कपात करण्याचे निर्देश•२९ जून, २०१७ च्या शासन निर्णयान्वये दिले आहे. वास्तविक हे निर्देश ज्या विभागांनी पदनिर्मितीसाठी निकष, कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्त्वे ठरविलेली नाहीत, त्या शासकीय विभागांसाठी आहेत. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील अकृषी विद्यापीठांसाठी हे निकष व कार्यप्रणाली ६ जुलै, २००९ रोजी निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या आधारे पदनिर्मिती करण्याचे ठरविण्यात आले असून, त्याचवेळी प्रत्येक विद्यापीठांची १८ ते २८ टक्के पदे कपात केली.

परंतु, शासन निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाºयांच्या पदांमध्ये ३० टक्के कपात करण्याचा घाट उच्च शिक्षण संचालनालय व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील काही उच्चपदस्थ अधिकाºयांचा असल्याचा आक्षेप घेण्यात आला. मात्र, या निर्णयाविरूद्ध तीनही शिखर संघटना एकवटल्या आहेत. महासंघ मिळून राज्यस्तरीय कृती समिती गठित करण्यात आली आहे.

 

उच्च शिक्षण संचालनालय विद्यापीठे व मंत्रालय यात समन्वयक म्हणून भूमिका पार पाडण्याऐवजी हटवादी भूमिका घेऊन मंत्रालयाची दिशाभूल करीत आहे. विद्यापीठे सक्षम करण्याऐवजी विद्यापीठांचे पंख छाटण्याचा हा प्रकार आहे.- अजय देशमुख,अध्यक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटना

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ