शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

- तर भातकुली तहसील कार्यालयाला कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:48 IST

अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देयुवा स्वाभिमानचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ५ जुलै रोजी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासंदर्भात शासनाचे महसूल व वन विभागाचे अवर सचिव नि.पा. आव्हाड यांनी १५ जून २०१७ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. भातकुली तहसील कार्यालय हे अमरावतीत नव्हे, तर तालुक्याच्या ठिकाणी असावेत, याकरिता रिट याचिका क्रमांक ३९११/२०१७ अन्वये निकाल लागला आहे. तसे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहे. असे असताना राजकीय दबावापोटी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भातकुली तहसील कार्यालय स्थलांतरित झाले नाही. मात्र, ५ जुलै अगोदर तहसील कार्यालय स्थलांतरित झाले नाही, तर कुलूप ठोकले जाईल, असा ईशारा देण्यात आला आहे. सध्या भातकुलीत ग्रामीण रूग्णालय, पोलीस ठाणे, कृषि कार्यालय असताना तहसील कार्यालयाचे स्थलांतरण का नाही, असा सवाल युवा स्वाभिमान पार्टीने उपस्थित केला आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना ३० ते ३५ कि.मी. अंतर गाठून कामानिमित्त अमरावती ये- जा करावी लागते. तहसील कामानिमित्त २०० रुपयांचा भुर्दंड पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेले तहसील कार्यालय स्थलांतरित करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा राजू रोडगे, जीतू दुधाने, मंगेश पाटील, राजू हरणे, रेखा पवार, गिरीश कासट, मयुरी कावरे, जया तेलखंडे, प्रदीप थोरात, पुरूषोत्तम खर्चान, शंकर डोंगरे, श्रीकृष्ण पाटील, आशिष कावरे, नरेंद्र तेलखडे, बाळू मिलखे आदींनी दिला.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार