शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

- तर भातकुली तहसील कार्यालयाला कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:48 IST

अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देयुवा स्वाभिमानचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ५ जुलै रोजी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासंदर्भात शासनाचे महसूल व वन विभागाचे अवर सचिव नि.पा. आव्हाड यांनी १५ जून २०१७ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. भातकुली तहसील कार्यालय हे अमरावतीत नव्हे, तर तालुक्याच्या ठिकाणी असावेत, याकरिता रिट याचिका क्रमांक ३९११/२०१७ अन्वये निकाल लागला आहे. तसे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहे. असे असताना राजकीय दबावापोटी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भातकुली तहसील कार्यालय स्थलांतरित झाले नाही. मात्र, ५ जुलै अगोदर तहसील कार्यालय स्थलांतरित झाले नाही, तर कुलूप ठोकले जाईल, असा ईशारा देण्यात आला आहे. सध्या भातकुलीत ग्रामीण रूग्णालय, पोलीस ठाणे, कृषि कार्यालय असताना तहसील कार्यालयाचे स्थलांतरण का नाही, असा सवाल युवा स्वाभिमान पार्टीने उपस्थित केला आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना ३० ते ३५ कि.मी. अंतर गाठून कामानिमित्त अमरावती ये- जा करावी लागते. तहसील कामानिमित्त २०० रुपयांचा भुर्दंड पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेले तहसील कार्यालय स्थलांतरित करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा राजू रोडगे, जीतू दुधाने, मंगेश पाटील, राजू हरणे, रेखा पवार, गिरीश कासट, मयुरी कावरे, जया तेलखंडे, प्रदीप थोरात, पुरूषोत्तम खर्चान, शंकर डोंगरे, श्रीकृष्ण पाटील, आशिष कावरे, नरेंद्र तेलखडे, बाळू मिलखे आदींनी दिला.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार