शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तलाव हटविण्यासाठी सरपंच महिलेसह तिघींनी घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 08:00 IST

Amravati News गाव तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सरपंच महिलेसह तीन महिलांनी विषाचा घोट घेतला.

ठळक मुद्दे प्रकृती गंभीर, अमरावतीला हलविले

अनंत बोबडे

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथील गाव तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सरपंच महिलेसह तीन महिलांनी विषाचा घोट घेतला. त्या तिघींनाही अत्यवस्थ स्थितीत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी दुपारी लोतवाडा येथे आंदोलनस्थळी ही घटना घडली.

             दरवर्षी पावसाळ्यामध्ये लोतवाडा गावातील नागरिकांच्या घरात गाव तलावाचे पाणी शिरते, त्यामुळे अतोनात नुकसान होते. जीवितहानी टाळता येणार नाही, अशी स्थिती आहे. सबब, गाव तलावाला हटवून इतरत्र गाव तलाव निर्माण करावा किंवा या गाव तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलावी, यासाठी गुरुवारी लोतवाडा येथील ग्रामस्थांपैकी सहाजणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच तीन महिलांनी विष घेतले. तर उर्वरित तीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरपंच पंचफुला कुऱ्हाडे, कोकिळा रक्षे, सुमित्रा रायबोले अशी विष घेणाऱ्या महिलांची नावे आहेत.

आश्वासनपूर्ती न झाल्याने आंदोलन

लोतवाडा येथे पाटबंधारे विभागाने दहा वर्षांपूर्वी गाव तलाव तयार केला. पाणी गावात शिरत असल्याने अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होते. जीवितहानी देखील नाकारता येत नाही. गतवर्षी तेथे भीमराव कुऱ्हाडे यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळी पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन देत हा गाव तलाव हटविण्याबाबत पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र, आश्वासनपूर्ती न झाल्याने कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वात सरपंच पंचफुला कुऱ्हाडे, कोकिळा रक्षे, सुमित्रा रायबोले, राजू रक्षे, सुभाष रायबोले यांनी पाटबंधारे विभागाला २४ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, दखल न घेण्यात आल्याने गुरुवारी गाव तलावाजवळ आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलन