शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सर्वोच्च न्यायालयाने दिले 'वडील' आणि 'काका' यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश

By गणेश वासनिक | Updated: January 31, 2024 21:54 IST

मुलगी आणि वडिलांनी सोडला 'मन्नेरवारलू' जमातीचा दावा

अमरावती : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध चैतन्या पालेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र. २५१९२/२०२३ दाखल केली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्याचे वडील संजय पालेकर यांनी ' मन्नेरवारलू ' अनुसूचित जमातीचा दावा सोडून दिला, असे शपथपत्र दाखल केले आहे. हे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डवर घेतले आणि याचिकाकर्त्याला 'वडील' आणि ‘काका' यांना प्रतिवादी म्हणून दोघांनाही आरोपी करण्याचे निर्देश दिलेत.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट यांनी चैतन्या पालेकर यांचे 'मन्नेरवारलू' जमातीचे जातप्रमाणपत्र रद्द केले होते. या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली होती. संविधानावरील पेटंट फसवणुकीचे ज्वलंत उदाहरण आहे, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे यांनी चैतन्या हिचे वडील संजय पालेकर आणि काका राजीव पालेकर यांचे 'मन्नेरवारलू' या अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द व जप्त केले. तसेच तत्कालीन अपिलीय अधिकारी अपर आदिवासी आयुक्त नाशिक यांनी दोघांचेही अपिल फेटाळले होते. ही वस्तुस्थिती दोघांनीही दडपली होती आणि पुन्हा नव्याने या दोघांनीही अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळविले होते. या दोघांच्या जातवैधतेच्या आधारावर आणखी तब्बल सात जणांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती यांनी संजय पालेकर यांना ३१ जानेवारी २००७ रोजी दिलेले ' जातवैधता ' प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसेच याचिकाकर्ती चैतन्या यांनीही 'मन्नेरवारलू' जातीच्या फायद्याचा दावा करणार नाही, असे विधान सर्वोच्च न्यायालयात केले आहे.

याचिकाकर्तीने एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला असून, इंटर्नशिपही पूर्ण केली आहे. हे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. याचिका प्रलंबित राहिल्यास याचिकाकर्त्याला कायद्यानुसार पदवी प्रमाणपत्र जारी करणे विद्यापीठासाठी खुले असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे. हे हल्ली प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.आदिवासी उमेदवाराच्या घटनात्मक हक्काची राखीव जागा बळकावून त्याला वैद्यकीय प्रवेशापासून वंचित करण्यात आले आहे. त्या शैक्षणिक सत्रातील राखीव जागेची भरपाई कशी करून देणार हा प्रश्न कायम आहे.- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र.