शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मिनीमंत्रालयातील या पूर्वीच्या भरतीचा विषय 'पेडिंगच'

By जितेंद्र दखने | Updated: April 18, 2023 17:47 IST

या अगोदर अर्ज भरलेल्यांचे काय ? ; उमेदवारांचा सवाल

अमरावती : ग्रामविकास विभागाने नुकतेच जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या पदभरतीला मान्यता दिली आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीसोबत करार केला आहे. तसेच ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांवर नाराजी दर्शवत ही पदभरती प्राधान्याने राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यापूर्वी २०१९ मध्ये १२ हजार पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यासाठी होते. शासनाकडे लाखो रुपये अर्ज भरणातून शुल्काच्या माध्यमातून प्राप्त झाले होते. जर शासनस्तरावरून नवीन जाहिरात काढली जाणार असेल तर जुन्या जाहिरातीचे काय? असा सवाल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी विचारत आहेत.

ग्रामविकास विभागाने राज्यभरातील १२ हजार पदांसाठी २०१९ मध्ये सरळसेवा भरतीची जाहिरात दिली होती. यासाठी १२ लाख उमेदवारांचे परीक्षा शुल्कापोटी लाखो रुपये शुल्कापोटी शासनाकडे जमा झाले होते. शासनाने ही प्रक्रिया रद्द केली होती. यानंतर विद्यार्थ्यानी राज्यभर आंदोलने केल्यानंतर शासनाने पुन्हा कार्यवाही सुरू केली. कोरोना संसरगामुळे उमेदवारांना दोन वर्षे वयाची सवलती ही त्यानंतर दिली तसेच या परीक्षा घेण्यासाठी दोन खासगी कंपन्यांची नेमणूक केली. यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदेश दिला आहे. अभियांत्रिकी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली. तरीही भरतीप्रक्रिया सुरू झालेली नाही.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची सरळसेवेने भरती सर्व जिल्हा परिषद मधील वर्गातील १८९३९ पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय घेतला मात्र आतापर्यत भरतीप्रक्रिया सुरू झालेली नसल्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पदभरती या विषयास सर्वोच्च प्राथमिकता द्यावी असा आदेश ग्रामविकास विभागाने दिला आहे.भरती प्रक्रियेचा कृती आराखडा दर्शनी भागात लावा

सरळ सेवा भरतीचा कृती आराखडा तयार करून ग्रामविकास विभागाने भरतीसाठी आतापर्यत शासन पातळीवर कोणती कारवाई केली तसेच भरती प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईपर्यंत त्याची माहिती उमेदवाला वेळोवेळी द्यावी या भरतीसाठी जिल्हा परिषदांनी संक्षिप्त टिपणी तयार करावी. भरती प्रक्रियेचा कृती आराखडा हा कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावा अशा सूचना या आदेशात दिल्या आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदjobनोकरीAmravatiअमरावती