शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यात दोनशे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा मुक्काम वर्षभरासाठीच; ना पत्ता, ना कार्यालये?

By गणेश वासनिक | Updated: December 1, 2023 16:59 IST

राजपत्रीत दर्जा पण वर्षभरात बदलतो पत्ता, भाड्याच्या ईमारतीतून कारभार, १३६ कोटींची मागणी मिळाले २७ लक्ष

अमरावती : राज्यातील सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची दैनावस्था झालेली असून १८० वनपरिक्षेत्राला त्यांचे हक्काचे कार्यालय, लिपीक नसल्याने वनाधिकारी वनीकरण विभागात येण्यास धजावत आहेत. या आर्थिक वर्षात या विभागाला केवळ २७ लाख रुपये मिळाले, अनेकांची भाडे थकीत आहे.

वनविभागाचे अंग असलेल्या सामाजिक वनीकरण विभागात राज्यात एकूण ३३ विभाग कार्यरत असून २८९ वनपरिक्षेत्र अधिकारी या विभागात कार्यरत आहेत. या विभागाचे प्रमुख कार्यालय पुणे येथे असल्याने नागपूर येथे स्थलांतरित करणे गरजेचे बनले आहे. सामाजिक वनीकरणात रोप निर्मिती, रस्त्याच्या कडेला रोपवने, गटात वृक्ष लागवड, हरित सेना उपक्रम, मग्रारोहयो कामे, शेतकरी बांध लागवड, बांबू रोपे निर्मिती असे कामे चालतात. मात्र प्रादेशिक वनविभागाच्या तुलनेत या विभागाल तुटपुंजा निधी मिळतो. राजपत्रीत अधिकाऱ्यांचा दर्जा असताना शासकीय वाहने, सहाय्यक कर्मचारी मिळत नाही.

शासकीय कामकाज प्रभावी राबविताना या विभागाच्या अधिकाऱ्यांची घालमेल होताना दिसून येते. वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना शासनाने ज्या सुविधा देणे अपेक्षीत आहेत. त्या मात्र सामाजिक वनीकरण विभागात उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. सुविधा मिळाव्या म्हणून सामाजिक वनीकरणाचे प्रमुख शासनाकडे पाठपुरावा सुद्धा करताना दिसून येत नाही. पुणे सारख्या मेट्रो शहरात राहण्याकरिता येथे काहीजण पोस्टींग घेतात. मात्र दुसरीकडे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना हाल सोसावे लागत आहेत.