शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

हंगामही संपला, कंपनीही बदलली, १.१९ लाख शेतकरी सोडले वाऱ्यावर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 3, 2023 16:48 IST

पीक विमा योजना : योजनेत सहभागी अन्य शेतकऱ्यांना परतावा केव्हा?

अमरावती : पीक विमा योजना म्हणजे कृषी विभागाला अवघड जागेचे दुखणे ठरले आहे. यंदाच्या खरिपासाठी नव्या कंपनीची निवड होऊन योजना लागू झाली. मात्र, गतवर्षीच्या हंगामातील पीक विम्याचा परतावा अद्याप १.१९ लाख शेतकऱ्यांना मिळालेला नाही, यामधील किती जणांना परतावा मंजूर केला ही नावेदेखील कंपनीस्तरावर जाहीर करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामात ८८ महसूल मंडळात झालेली अतिवृष्टी व तीन महिने असणारा सततचा पाऊस यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४२ जाहीर झाली. हाता-तोंडचा घास हिरावल्या गेल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी २,१९,१०१ शेतकऱ्यांना सरसकट परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यातुलनेत कंपनीद्वारा ९९,९४२ शेतकऱ्यांना ९२.२४ कोटींचा परतावा देण्यात आलेला आहे.

आतापर्यंत कंपनीद्वारा देण्यात आलेला परतावा हा ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिली त्यांना व काढणीपश्चात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांनाच देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिलेली नाही, त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देणे क्रमप्राप्त असताना अद्याप कंपनीद्वारा या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा