शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीय जनजाती आयोगाला अध्यक्ष, उपाध्यक्ष नाहीत; आदिवासींनी न्याय मागायचा कुणाला?

By गणेश वासनिक | Updated: August 13, 2023 14:16 IST

ट्रायबल फोरमचा सवाल, दीड महिन्यापासून पद रिक्त, दिल्लीत आयोगाकडे तक्रारींच्या ढिग

अमरावती : आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काचे संरक्षण व्हावे, त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा व तत्संबंधी राष्ट्रपतींना आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात दरवर्षी अहवाल सादर करणाऱ्या आणि घटनात्मक असलेल्या राष्ट्रीय जनजाती आयोगाला गत दीड महिन्यासून अध्यक्ष,उपाध्यक्ष नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाने न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न आदिमांच्या चळवळीत अग्रगण्य असलेल्या 'ट्रायबल फोरम' संघटनेचे राज्य सचिव तथा सेवानिवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी एकनाथ भोये यांनी उपस्थित केला आहे.राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहाण यांनी २६ जून २०२३ रोजी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आठ महिन्यांपूर्वीच अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ नुसार केंद्रात पुर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग होता. सन २००३ मध्ये ८९ वी घटनादुरुस्ती होऊन त्यात नवीन अनुच्छेद ३३८(ए) समाविष्ट करण्यात आले. परिणामतः १९ फेब्रुवारी २००४ मध्ये राष्ट्रीय जनजाती आयोग निर्माण झाला. आता अनुसूचित जमातीसाठी केंद्रात स्वतंत्र आयोग आहे. राष्ट्रीय जनजाती आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष व तीन सदस्य आहेत. या तीन सदस्यात एका महिला सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. जुलै २०१९ मध्ये अनुसया उईके यांची छत्तीसगढ राज्यपालपदी नियुक्ती झाल्यामुळे उपाध्यक्ष पदही तेव्हापासून रिक्तच आहे. सध्या त्या मणिपूरच्या राज्यपाल आहेत.राष्ट्रीय जनजाती आयोगाला अध्यक्ष, उपाध्यक्ष नसणे ही बाब योग्य नाही. आदिवासींचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आयोगाचे परिपूर्ण गठन करावे, यासंदर्भात केंद्रीय आदिवासी विकास मंत्री, सचिवांना पत्राद्वारे विनंती केले जाईल. आदिवासींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- नवनीत राणा, खासदार, अमरावती 

टॅग्स :Amravatiअमरावती