शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुपोषित मेळघाटातील ४० हजारांवर मजुरांचे हात थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2023 08:00 IST

Amravati News महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाशिवाय दुसरा पर्याय नाही. कुपोषणग्रस्त मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील आदिवासी नागरिकांची व्यथा संपेना अशीच आहे.

नरेंद्र जावरे

अमरावती : त्यांची कोरडवाहू शेती आहे. पिकलं तेवढं मिळालं, बाकी भगवान भरोसे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाशिवाय दुसरा पर्याय नाही. कुपोषणग्रस्त मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील आदिवासी नागरिकांची व्यथा संपेना अशीच आहे. आता त्यावरही कळस म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांच्या संपामुळे हातचे काम बंद पडल्याने पोटापाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर गटविकास अधिकाऱ्यांनी ११ एप्रिलपासून बहिष्कार टाकला. त्यामुळे वैयक्तिक लाभासह सार्वजनिक कामे पूर्णत: ठप्प झाल्याने ‘मागेल त्याला काम’ मिळणे बंद आहे. मागील पंधरा दिवसांपासून काम सुरू होण्याची प्रतीक्षा आदिवासींना आहे. तालुक्यातील ४० हजार, तर जिल्ह्यातील ५५ हजार मजुरांचे हातावर हात आहेत.

राज्यात चिखलदरा अव्वल, हजारो हात थांबले

संपूर्ण राज्यात मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षी केली जातात. ४० हजारांच्या जवळपास मजूर येथे कामावर उपस्थित राहतात. खंडविकास अधिकाऱ्यांच्या या बहिष्कारामुळे हजारो हात रिकामे झाले आहेत. कामाच्या प्रतीक्षेत गावोगावी जत्थे करून आदिवासी बसले आहेत.

हमको कायको बीच मे डालता..?

‘शासन और अधिकारी तुम अपना आपस मे देखो. हम गोरगरीब मजदूर को बीच मे डाल कर हमारा मजदूरी क्यू डुबाता? दुसरा कोनसा काम करेगा हम लोगोंने?’ - चिखलदरा तालुक्यातील डोमा गावातील सुकराय धिकार या आदिवासी मजूर महिलेचे शब्द बरेच बोलके आहेत. मागण्या कोणाच्या, आंदोलन कोणाचे, फटका कुणाला, या एका वाक्यात तिने शासन-प्रशासनाचे कान उपटले आहेत. यात तात्काळ निर्णय देण्याची व काम सुरू करण्याची तिची मागणी आहे.

काय आहे सध्याची परिस्थिती?

जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी २०९४ मग्रारोहयोच्या कामांवर ५५ हजार मजूर हजर होते. शनिवारी ८३४ कामांवर १४ हजार ७१३ मजूर उपस्थित आहेत. ५५ हजारांपैकी ४० हजार एकट्या चिखलदरा तालुक्यातील मजुरांची संख्या आहे, हे विशेष.

सर्वाधिक कामे ग्रामपंचायतची

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वैयक्तिक लाभाची घरकुल, वृक्ष लागवड, विहिरी, रस्ते अशा प्रकारची विविध कामे जॉबकार्डधारक मजूर करतात. मेळघाटात वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा जवळपास सर्वच यंत्रणांमध्ये पंचायत समिती अखत्यारीतील ग्रामपंचायतींमध्येच सर्वाधिक कामे असल्याने त्याचा फटका बसला आहे.

शासनाने अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून गोरगरिबांवरील अन्याय थांबवावा. चिखलदरा तालुक्यात राज्यात सर्वाधिक मजुरांची संख्या असताना येथे विशेष लक्ष देण्यात यावे.

- अल्केश महल्ले, अध्यक्ष, सरपंच संघटना, चिखलदरा

टॅग्स :Governmentसरकार