शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बाधित ७७ टक्के शेतकऱ्यांचे अर्ज पीक विमा कंपनीने फेटाळले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 24, 2023 16:54 IST

अवकाळी पावसासह गारपिटीचे नुकसान, कंपनीची मनमानी सुरूच

अमरावती : जिल्ह्यात १९ ते १९ मार्चदरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने साडेतीन हजार हेक्टरमधील शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीसह काढणीपश्चात रबी पिकांचे नुकसान झालेल्या ३,४७८ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या. यापैकी २,४९८ म्हणजेच ७७ टक्के अर्ज कंपनीने नाकारले आहे.

जिल्ह्यात पीक विमा कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. गतवर्षीच्या खरिपातील १४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला असताना कंपनीने अद्याप परतावा दिलेला नाही. आता अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा पिकाचे नुकसान झालेले आहे. याशिवाय सवंगणी केल्यानंतर बहुतेक शेतकऱ्याचे काढणीपश्चातही नुकसान झाले आहे. या दोन्ही आपत्तीसाठी पीक विम्याचा परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे.

अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका

यासाठी बाधित ३४७८ शेतकऱ्यांनी नुकसानीचे ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी २८४७ अर्ज विविध कारणांनी कंपनीद्वारा नाकारण्यात आलेले आहेत. फक्त ६३१ अर्ज कंपनीद्वारा स्वीकारण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमाAmravatiअमरावतीFarmerशेतकरी