शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

राज्य शासनाच्या कार्यालयांमध्ये आता 'मिशन मोड', फाईलीवरील धूळ झटकण्यासाठी उपक्रम

By गणेश वासनिक | Updated: September 27, 2022 17:59 IST

राज्य शासनाच्या कार्यालयांमध्ये आता 'मिशन मोड' ही संकल्पना राबवली जात आहे. 

अमरावती : भारताचे पंतप्रधान ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयात सध्या प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याकरिता 'मिशन मोड' ही संकल्पना राबविली जात आहे. त्यामुळे फाईलीवरील धुळ कमी होणार आहे. केंद्र व राज्य शासनाचे सर्व विभाग ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा बजावत असतात, त्यात लोकसेवा हमी कायदा लागू झालेला असल्याने प्रत्येक विभागाने त्यांच्याकडे असलेल्या सेवा निर्धारित वेळेत निकाली काढणे बंधनकारक आहे. 

मात्र शासन सेवकाच्या लेटलतीफ कारभाराचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसतो. परिणामी अनेक कामे वेळेच्या आत पुर्ण होताना दिसून येत नाही. सरकारी कामात-दिरंगाई होणार नाही. याची दक्षता घेऊन प्रशासकीय कामात दिरंगाई होणार नाही. याची दक्षता घेऊन प्रशासकीय कामकाज गतीमान करण्यासाठी हा कायदा लागू झालेला आहे. मात्र अद्यापही या कायद्याची हवी तशी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे वाढदिवसापूर्वी पासून १० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा शासकीय विभागांसाठी सुरु केलेला आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्याच्या सर्व विभाग प्रमुखांना सेवा पंधरवाडा राबवुन त्यांच्या कार्यालयाशी निगडीत सेवे अंतर्गत येणाऱ्या तक्रारी अर्ज, यांचा निपटारा करण्यासाठी २ ऑक्टोंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

सेवा पंधरवाड्यात काय केले जाईल१० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित असलेली प्रकरणे या पंधरवाड्यात निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांना अवगत केलेले आहे. वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणांमुळे निकाली काढण्यात येईल तसा आढावा दर आठवड्याला घेतला जाणार आहे. तक्रारी वेळेत निकाली न काढल्या दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावित केली जाणार आहे.

शासकीय कार्यालयात लगबग विविध कारणाने सर्व सामान्यांची कामे प्रलंबित ठेवणे ते आता जमणार नाही. कारण ऑनलाईन प्रक्रियेच्या सेवांवर थेट मंत्रालयातील संबंधीत विभागाचे प्रधान सचिव ब्रिफींग घेत आहे. याकरिता केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्ताकरिता विवरणपत्र अ, ब, विभाग कार्यालयास देण्यात आलेले आहे. प्रलंबित अहवालामध्ये सविस्तर देणे क्रमप्राप्त आहे. तसेच ही माहिती ऑनलाईन पद्धतीने द्यावी लागणार आहे. या पंधरवाड्यामुळे प्रलंबित अर्जावरील धूळसाफ करण्याची धडपड शासकीय कार्यालयात दिसून येत आहे. 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीState Governmentराज्य सरकार