शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

विमा कंपनीचे आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले; ४१ मंडळांतील सोयाबीनच्या अग्रिमसाठी अंतिम आदेश जारी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 17, 2023 19:43 IST

जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीद्वारा नोंदविलेले आक्षेपाचे खंडन केले व जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले आहेत.

अमरावती : ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे ४१ महसूल मंडळांतील सोयाबीनचे ५० टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा २५ टक्के अग्रिम मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी २१ सप्टेंबरला अधिसूचना काढली होती. यावर पीक विमा कंपनीने नोंदविलेले आक्षेपाचे कृषी विभागाने खंडन केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १६ ऑक्टोबरला अंतिम आदेश जारी केले.

पावसाच्या खंडामूळे सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास संभाव्य पीक विमा भरपाईच्या तुलनेत २५ टक्के अग्रिम देण्याची तरतूद पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहे. त्यामुळे कंपनी सर्व्हेअरला सोबत घेत कृषी विभागाने रॅन्डमपणे गावे निवडून संयुक्त सर्व्हे केला होता. यानंतर जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना निर्गमित केली होती. यावर २६ सप्टेंबरला कंपनीद्वारा आक्षेप नोंदविण्यात आले.

जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीद्वारा नोंदविलेले आक्षेपाचे खंडन केले व जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी १६ ऑक्टोबरला अंतिम आदेश जारी केले आहेत व पीक विमा कंपनीला ते  बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती