शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

आमला-पुलगाव आर्मी महामार्गाची केली खड्ड्यांनी चाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:55 IST

Amravati : राज्य महामार्गाच्या देखभालीकडे उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : आमला ते पुलगाव या आर्मी महामार्गाची दैनावस्था झाली आहे. संवेदनशील असलेल्या या राज्य महामार्गाच्या देखभालीकडे उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या महत्त्वपूर्ण मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे व रस्त्याच्या कडेला वाढलेल्या खुरट्या झुडपांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

वरुड ते हातुर्णापर्यंत आर्मी महामार्ग अतिशय क्षतिग्रस्त झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, हे कळायला मार्ग नाही. रस्ताच हरवल्यासारखे खड्डे पडल्याने दररोज अपघात घडत असून, राष्ट्रीय महामार्ग विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसत आहे. आमला ते पुलगाव हा मिलिटरी रस्ता वरुडवरून हातुर्णामार्गे पुढे नागपूर-अमरावती या राष्ट्रीय हायवे क्रमांक ६ ला तळेगाव येथे मिळतो. या रस्त्याची दर्जोन्नती करून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. वरुड तळेगाव या महामार्गावर अतिशय खड्डे पडले असून, खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज अपघात घडतात. राजुरा बाजार ते हातुर्णापर्यंत आठ किलोमीटरपर्यंतचा रस्ता अतिशय हलाखीचा झाला असून खड्ड्यांत हरविला आहे. या रस्त्यावर निव्वळ खड्डयांचे साम्राज्य आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दखल घेत किमान डागडुजी व पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दोन वर्षांपासून डागडुजी नाही आर्मी महामार्गाच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. तथापि, दोन वर्षापासून साधी डागडुजीही नाही. दिशादर्शक फलक नाही. काटेरी झुडपे रस्त्यावर आली आहेत. खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीचालकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

सततची वर्दळआमला-पुलगाव महामार्ग वरुडहून राजुरा मार्गे हातुर्णाला जातो. राजुरा बाजार हे गाव हिरव्या मिरचीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गुरांची मोठी बाजारपेठ आहे. वर्दळीच्या दृष्टीने या मार्गाची देखभाल सातत्याने होणे गरजेचे असताना बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आतादेखील आहे. फक्त सिमेंट रोड हा एनएचएआयकडे आहे.- ईश्वरानंद पनपालिया, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती

आमचा नियमित रहदारीचा हा रस्ता आहे. परंतु या रस्त्याची चाळण झाल्यने अनेकांना मणक्याचे आजार जडले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेत किमान तातडीने डागडुजी व पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात यावे.- दामोदर ताथोडे, बेलोरा (ताथोडे), ता. वरुड

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार