शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हा कचेरीसमोर तळली भजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:02 IST

केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीचे धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर पकोडे तळून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, रविकांत वर्पे, निखिल ठाकरे, सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देन्याय द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीचे धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर पकोडे तळून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, रविकांत वर्पे, निखिल ठाकरे, सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.उच्च शिक्षण घेऊनही लाखो तरुणांना नोकरीसाठी भटकावे लागत आहे. रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भाजप सरकारच्या काळातच २०१७-१८ मध्ये बेरोजगारी दर ६.१ टक्के झाला आहे. अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करणाºया मोदी सरकारने नोकºया, उद्योगवाढीसाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देणाºया या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील पाच वर्षांत देशभरातील दोन कोटी तरुणांनी नोकºया गमावल्या. उच्चशिक्षित बेरोजगार युवकांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. बेरोजगारी तब्बल ४५ वर्षांतील सर्वात अधिक आहे. म्हणजे, गेल्या वर्षभरात सर्वाधिक बेरोजगार निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या सरकारने बेरोजगारांना न्याय देण्यासाठी कुठलेही ठोस पावले उचलले नाही. सरकारच्या बेरोजगारांबाबत निष्क्रिय धोरणांचा तीव्र निषेध करीत बेरोजगारांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली.आंदोलनात प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस निखिल ठाकरे, धीरज निंभोरकर, गजानन रेवाळकर, आकाश हिवसे, प्रफल्ल ठाकरे, अमित जगताप, ऋग्वेद देशमुख, ऋषीकेश बारब्दे, प्रथमेश ठाकरे, मंगेश ढगे, अक्षय महल्ले, संकेत ठाकरे, विवेक खंडारे, ऋषीकेश चिकटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.