शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जिल्हा कचेरीसमोर तळली भजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:02 IST

केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीचे धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर पकोडे तळून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, रविकांत वर्पे, निखिल ठाकरे, सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देन्याय द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीचे धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर पकोडे तळून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, रविकांत वर्पे, निखिल ठाकरे, सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.उच्च शिक्षण घेऊनही लाखो तरुणांना नोकरीसाठी भटकावे लागत आहे. रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भाजप सरकारच्या काळातच २०१७-१८ मध्ये बेरोजगारी दर ६.१ टक्के झाला आहे. अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करणाºया मोदी सरकारने नोकºया, उद्योगवाढीसाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देणाºया या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील पाच वर्षांत देशभरातील दोन कोटी तरुणांनी नोकºया गमावल्या. उच्चशिक्षित बेरोजगार युवकांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. बेरोजगारी तब्बल ४५ वर्षांतील सर्वात अधिक आहे. म्हणजे, गेल्या वर्षभरात सर्वाधिक बेरोजगार निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या सरकारने बेरोजगारांना न्याय देण्यासाठी कुठलेही ठोस पावले उचलले नाही. सरकारच्या बेरोजगारांबाबत निष्क्रिय धोरणांचा तीव्र निषेध करीत बेरोजगारांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली.आंदोलनात प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस निखिल ठाकरे, धीरज निंभोरकर, गजानन रेवाळकर, आकाश हिवसे, प्रफल्ल ठाकरे, अमित जगताप, ऋग्वेद देशमुख, ऋषीकेश बारब्दे, प्रथमेश ठाकरे, मंगेश ढगे, अक्षय महल्ले, संकेत ठाकरे, विवेक खंडारे, ऋषीकेश चिकटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.