शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

टीईटीकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: October 15, 2014 23:13 IST

नोकरीच्या घटलेल्या संधी, पहिल्या टीईटीचा घटलेला निकाल याचा परिणाम डिसेंबरमध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेवर होण्याची शक्यता आहे.परीक्षा अर्जाच्या प्रक्रियेकडे शिक्षणशास्त्र

अमरावती : नोकरीच्या घटलेल्या संधी, पहिल्या टीईटीचा घटलेला निकाल याचा परिणाम डिसेंबरमध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेवर होण्याची शक्यता आहे.परीक्षा अर्जाच्या प्रक्रियेकडे शिक्षणशास्त्र पदविकाधारकांनी (डीटीएड) पुरती पाठ फिरविली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ आॅक्टोबरपासून सुरू झाली. यात २२ आॅक्टोबरपर्यंतच विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्यापरीक्षेसाठी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डीटीएडधारकांनी फार कमी प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. राज्यात डीटीएड धारक बेरोजगारांची संख्या नऊ ते दहा लाखांच्या घरात आहे. पात्र उमेदवारांच्या तुलनेत नोकरीच्या संधी फारशा नाही. यातच दरवर्षी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अशातच मागील वर्षीपासून नेट सेटच्या धर्तीवर राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा सुरू झाली. परंतु पहिल्या परीक्षेतही अनेक मागे राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. यामुळे त्याचा परिणाम डिसेंबर २०१४ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या टीईटी परीक्षेवर होणार असल्याची शक्यता विद्यार्थ्यांनी वर्तविली आहे.पहिल्या टिईटीचा निकाल केवळ पाच टक्के लागला होता . परीक्षेतही काही त्रुटी हात्या काही प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला होता. याचा परिणाम ही परीक्षेवर झाल्याचे बोलले जात आहे.पहिल्या टीईटीला प्राथमिक स्तरावरील पेपरसाठी अमरावतीसह राज्यातील ३ लाख ६७ हजार ८९६ डीटीएड धारक बसले होते. यापैकी ४. ४३ तर दुसऱ्या माध्यमिक स्तरावरील पेपरसाठी २ लाख २४ हजार ९४ विद्यार्थ्यांनी सभाग घेतला होता. यामधील ५. ९५ टक्केच विद्यार्थी पात्र ठरले. यामुळे दर्जाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.