शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावी उन्हाळी २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रानुसारच होणार आहे. यात ...

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावी उन्हाळी २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रानुसारच होणार आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.

दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या दरम्यान होतील. तर, बारावीच्या लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ यादरम्यान होणार आहे. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा ५ ते २१ एप्रिल यादरम्यान नियोजन करण्यात आली आहे. हल्ली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोरोना नियमावलींचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येतील, ही बाब शिक्षण मंडळाने स्पष्ट केली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत अथवा तारखांविषयी समाजमाध्यम, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या, मॅसेजद्धारे गैरसमज पसरविला जात आहे. परंतु, परीक्षांच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नाही. नियोजित वेळापत्रकानुसार निश्चित केंद्रावर परीक्षा होतील, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गाेसावी यांनी सांगितले. अमरावती विभागात दहावीचे १,६४,६३२ तर बारावीचे १,३७,५६९ परीक्षार्थी आहेत.

--------------------

ऑनलाईन शिक्षणावर भर

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जवळ येत असताना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. शिक्षकांशी संवाद, अभ्यासादरम्यान येणाऱ्या अडचणीदेखील ऑनलाईन सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असून, कोरोना संसर्गाने यंदा शैक्षणिक सत्र धुळीस मिळविल्याची भावना विद्यार्थ्यांची आहे. वर्गात शिक्षण घेण्याची काही औरच पद्धत असते. ती ऑनलाईन शिक्षणात येऊ शकत नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

--------------------

अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चिंता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वर्ग शिकवणी बंद आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थांना अडचणींचे ठरणारे आहे.