शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावी उन्हाळी २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रानुसारच होणार आहे. यात ...

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावी उन्हाळी २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रानुसारच होणार आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.

दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या दरम्यान होतील. तर, बारावीच्या लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ यादरम्यान होणार आहे. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा ५ ते २१ एप्रिल यादरम्यान नियोजन करण्यात आली आहे. हल्ली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोरोना नियमावलींचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येतील, ही बाब शिक्षण मंडळाने स्पष्ट केली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत अथवा तारखांविषयी समाजमाध्यम, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या, मॅसेजद्धारे गैरसमज पसरविला जात आहे. परंतु, परीक्षांच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नाही. नियोजित वेळापत्रकानुसार निश्चित केंद्रावर परीक्षा होतील, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गाेसावी यांनी सांगितले. अमरावती विभागात दहावीचे १,६४,६३२ तर बारावीचे १,३७,५६९ परीक्षार्थी आहेत.

--------------------

ऑनलाईन शिक्षणावर भर

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जवळ येत असताना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. शिक्षकांशी संवाद, अभ्यासादरम्यान येणाऱ्या अडचणीदेखील ऑनलाईन सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असून, कोरोना संसर्गाने यंदा शैक्षणिक सत्र धुळीस मिळविल्याची भावना विद्यार्थ्यांची आहे. वर्गात शिक्षण घेण्याची काही औरच पद्धत असते. ती ऑनलाईन शिक्षणात येऊ शकत नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

--------------------

अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चिंता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वर्ग शिकवणी बंद आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थांना अडचणींचे ठरणारे आहे.