शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:12 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी, बारावाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी, बारावाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला. परिणामी अमरावती विभागात दहावीचे १,६४, ६३२ तर, बारावीच्या १,३७,५६९ विद्यार्थ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांत दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन चालविले होते. दहावीसाठी २,५११ तर, बारावीसाठी १,५१९ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. तसेच दहावीचे १,६४,६३२ तर, बारावी परीक्षेसाठी १,३७,५६९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार होते. मात्र, आता परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी काही काळ परीक्षेतून टेन्शनमुक्त झाले आहेत.

--------------------

बारावीच्या परीक्षेसाठी असे होते केंद्र

अकोला- २६८

अमरावती- ३९५

बुलडाणा- ३१७

यवतमाळ- ३४८

वाशिम- १९१

--------------------

दहावीच्या परीक्षेसाठी प्रस्तावित केंद्र

अकोला ४३९

अमरावती ६६५

बुुलडाणा ५०३

यवतमाळ ६०९

वाशिम २९५

———————————

बारावीच्या परीक्षा केंद्रावर असे राहिल मनुष्यबळ

अकोला- २०९३

अमरावती -३१२५

बुलडाणा- २६४१

यवतमाळ - २७२४

वाशिम - १५७५

——————————

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निर्णयानुसार दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुढील आदेशानुसार परीक्षांचे नियोजन करण्यात येईल. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षा पोस्टपोनबाबत कळविण्यात येईल.

- जयश्री राऊत,सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ