शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दहा नगर परिषद, चार नगरपंचायतींची थकबाकी पाच कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

मोहन राऊत- धामणगाव रेल्वे : गत दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील दहा नगर परिषद व चार नगरपंचायतींची थकलेली मालमत्ता ...

मोहन राऊत- धामणगाव रेल्वे : गत दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील दहा नगर परिषद व चार नगरपंचायतींची थकलेली मालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम तब्बल पाच कोटींच्या घरात आहे. वसुलीसाठी प्रशासनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे घर चालवायचे की कर भरायचा, असा प्रश्न थकबाकीदारांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी, शेंदूरजनाघाट, चांदूर बाजार, दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा या नगर परिषदा तसेच तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, धारणी या नगरपंचायतींमध्ये करवसुली दोन वर्षांच्या कोरोनाकाळात २० टक्क्यांच्या आत आहे. त्यासंबंधी अहवालच राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाला संबंधित नगर परिषद व नगरपंचायतींनी पाठविला आहे.

-------------

काय म्हणतात धामणगावातील थकबाकीदार?

कर भरावा इतके उत्पन्नच या दोन वर्षात झाले नसल्याचे थकबाकीदार सांगतात.आता कुठेतरी प्रवासी ये-जा करतात. उत्पन्न मर्यादित आहे. त्यामुळे घर टॅक्स भरणे सध्या शक्य नाही, अशा प्रतिक्रिया काही ऑटोरिक्षाचालकांनी दिल्या. नगर परिषदेचा टॅक्स नियमित भरतो. आता दोन वर्षापासून कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. टप्प्याटप्प्याने संबंधित कर भरण्यास आम्ही तयार आहोत, असे एका भाजीविक्रेत्याने सांगितले. दोन वर्षानंतर आता कुठे दुकान उघडले. त्याचे थकलेले भाडे भरावे की घरखर्च चालवावा, हा प्रमुख प्रश्न सलून संचालकांपुढे आहे. महिन्याला केवळ दीड हजार रुपये मिळतात. ते उत्पन्नदेखील कोरोनाकाळात नव्हते. काही घर मालकांनी काम करण्यासाठी परवानगी दिली. त्यात आधी कर कसा भरणार, असा प्रश्न घरकामगार महिलांनी केला आहे. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता कठीण झाले आहे. टॅक्स कसा भरायचा, असा सफाई कामगारांसह फेरीवाल्यांचा थेट सवाल आहे.

-------------

धामणगावात ५० लाखांची थकबाकी

धामणगाव नगर परिषदेच्या पाच हजार कुटुंब प्रमुखांकडे पन्नास लाखांच्या जवळपास थकबाकी आहे. मागील दोन वर्षांत नगर परिषदेने कोरोना काळामुळे मालमत्ता व पाणीपट्टी कर काही अंशी वसूल केला असला आता युद्धस्तरावर वसुली सुरू आहे. सध्या मोठ्या व्यवसायिकांकडे या वसुलीची मागणी होत आहे.

- प्रशांत उरकुडे, मुख्याधिकारी, नगर परिषद धामणगाव रेल्वे