शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

सांगा, जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कलावंतांकडे रिक्षा चालविणे, सुरक्षा रक्षक, कंत्राटी स्वच्छता, मोलमजुरी करणे हे पर्यायी रोजगाराचे साधन आहेत.

ठळक मुद्देबँड कलावंतांची व्यथा : जिल्ह्यात पाच हजार बेरोजगारांवर उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनामुळे सार्वत्रिक लग्न सोहळे, मुंजे व इतर आनंदाचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे बॅन्ड पथक आणि कलावंतांना गत तीन महिन्यांपासून रोजगार नाही. अतिशय हलाखीचे जगणे. सकाळी कामावर गेल्याशिवाय सायंकाळी चूल पेटत नाही, अशी विदारक स्थिती बँन्ड कलावंत असलेल्या मातंग बांधवांची आहे. त्यामुळे आता आम्ही जगायचे कसे, असा सवाल जिल्ह्यातील सुमारे पाच हजार बँन्ड कलावंतांनी उपस्थित केला आहे. गत दोन दिवसांपूर्वी अमरावती दौऱ्यावर आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बँन्ड कलावंतांनी समस्यांचे निवेदन दिले.पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कलावंतांकडे रिक्षा चालविणे, सुरक्षा रक्षक, कंत्राटी स्वच्छता, मोलमजुरी करणे हे पर्यायी रोजगाराचे साधन आहेत. मातंग समाजातील महिलादेखील कष्टकरी, श्रमजिवी म्हणून राबतानाचे चित्र आहे. गरिबी, हलाखीचे जगणे, श्रमातून मिळणाºया तुटपुंज्या रकमेवर उपजिविका हे बँन्ड कलावंत भागवितात. त्यामुळे बँन्ड कलावंतांच्या कुटंबीयातील नव्या पिढीने या पंरपरागत व्यवसायाकडे पाठ फिरवित शिक्षणाची कास धरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुमारे ५०० बँन्ड पार्टी असून, प्रति २० ते ३० हजार रुपयांत करार करून बँन्ड पथक वाजवितात. कोरोनाचा मुला-बाळांच्या शिक्षणावर प्रभाव नक्कीच होणार आहे.तीन बँड कलावंतांनी मृत्यूला कवटाळलेकोरोना महामारीच्या काळात बँन्ड कलावंतांना रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे उपासमारीने तीन बँड कलावंतांचा मृत्यू झाला. याबाबत पाच वेळा शासनाकडे निवेदन देण्यात आले. अद्यापही त्याची ना चौकशी, ना तपास करण्यात आला. शासनाच्या नोंदी मातंग समाजाचे बँड कलावंत हे कलावंत नाही, अशी भूमिका असल्याचा आरोप श्रीराम बँडचे संचालक महेंद्र सरकटे यांनी केला आहे. त्यामुळे मृत्युमूखी पडलेल्या तीन बँन्ड कलावंतांना न्याय मिळावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.बँन्ड कलावंत हा कोणत्याही संगीत विद्यालयात जात नाही. तो परंपरागत कलावंत आहे. तीन ते चार महिनेच बँन्ड क लावंतांना सुगीचे दिवस असतात. त्यामुळे शासनाने मानधन देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करावी.-गणेशदास गायकवाड, संचालक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न