शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सांगा, जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कलावंतांकडे रिक्षा चालविणे, सुरक्षा रक्षक, कंत्राटी स्वच्छता, मोलमजुरी करणे हे पर्यायी रोजगाराचे साधन आहेत.

ठळक मुद्देबँड कलावंतांची व्यथा : जिल्ह्यात पाच हजार बेरोजगारांवर उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनामुळे सार्वत्रिक लग्न सोहळे, मुंजे व इतर आनंदाचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे बॅन्ड पथक आणि कलावंतांना गत तीन महिन्यांपासून रोजगार नाही. अतिशय हलाखीचे जगणे. सकाळी कामावर गेल्याशिवाय सायंकाळी चूल पेटत नाही, अशी विदारक स्थिती बँन्ड कलावंत असलेल्या मातंग बांधवांची आहे. त्यामुळे आता आम्ही जगायचे कसे, असा सवाल जिल्ह्यातील सुमारे पाच हजार बँन्ड कलावंतांनी उपस्थित केला आहे. गत दोन दिवसांपूर्वी अमरावती दौऱ्यावर आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बँन्ड कलावंतांनी समस्यांचे निवेदन दिले.पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कलावंतांकडे रिक्षा चालविणे, सुरक्षा रक्षक, कंत्राटी स्वच्छता, मोलमजुरी करणे हे पर्यायी रोजगाराचे साधन आहेत. मातंग समाजातील महिलादेखील कष्टकरी, श्रमजिवी म्हणून राबतानाचे चित्र आहे. गरिबी, हलाखीचे जगणे, श्रमातून मिळणाºया तुटपुंज्या रकमेवर उपजिविका हे बँन्ड कलावंत भागवितात. त्यामुळे बँन्ड कलावंतांच्या कुटंबीयातील नव्या पिढीने या पंरपरागत व्यवसायाकडे पाठ फिरवित शिक्षणाची कास धरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुमारे ५०० बँन्ड पार्टी असून, प्रति २० ते ३० हजार रुपयांत करार करून बँन्ड पथक वाजवितात. कोरोनाचा मुला-बाळांच्या शिक्षणावर प्रभाव नक्कीच होणार आहे.तीन बँड कलावंतांनी मृत्यूला कवटाळलेकोरोना महामारीच्या काळात बँन्ड कलावंतांना रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे उपासमारीने तीन बँड कलावंतांचा मृत्यू झाला. याबाबत पाच वेळा शासनाकडे निवेदन देण्यात आले. अद्यापही त्याची ना चौकशी, ना तपास करण्यात आला. शासनाच्या नोंदी मातंग समाजाचे बँड कलावंत हे कलावंत नाही, अशी भूमिका असल्याचा आरोप श्रीराम बँडचे संचालक महेंद्र सरकटे यांनी केला आहे. त्यामुळे मृत्युमूखी पडलेल्या तीन बँन्ड कलावंतांना न्याय मिळावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.बँन्ड कलावंत हा कोणत्याही संगीत विद्यालयात जात नाही. तो परंपरागत कलावंत आहे. तीन ते चार महिनेच बँन्ड क लावंतांना सुगीचे दिवस असतात. त्यामुळे शासनाने मानधन देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करावी.-गणेशदास गायकवाड, संचालक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न