शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

यूजीसी नेट ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण; एकतास उशिरा सुरू झाली परीक्षा

By उज्वल भालेकर | Updated: December 13, 2023 20:35 IST

बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला.

अमरावती : यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) ऑनलाइन परीक्षा ६ डिसेंबरपासून सुरू आहेत. बुधवारी या दुसऱ्या शिफ़्ट दरम्यान आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल एक तास परीक्षा सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला.सहायक प्राध्यापक तसेच ज्युनिअर फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकांसाठी  यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यानुसार ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत ही ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. एनटीए’च्या वेळापत्रकानुसार दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.  परंतु या ऑनलाइन परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १२ डिसेंबरला परीक्षा सुरू झाल्यानंतर दीडतासाने अचानक तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा बंद पडली होती. तर बुधवारी दुसऱ्या सत्रातील परीक्षा ही दुपारी ३ वाजता सुरू होणे अपेक्षित होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा ४ वाजता सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या अर्धातासपूर्वीच प्रवेश बंद केला होता. पाच मिनिट उशीर झाला तरीही परीक्षार्थींना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळेसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवर असलेल्या पीसी पॉईंट प्लॅनेट प्लाझा केंद्रावर  इतर जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील परीक्षार्थी हे एक तासापूर्वीच केंद्रावर पोहचले होते. परंतु परीक्षा उशीरा एक तास उशिरा सुरू झाल्याने ६ वाजता सुटणारी परीक्षा सायंकाळी ७ वाजता आटोपल्याने अनेक परीक्षार्थीच्या परतीच्या प्रवेशाचे नियोजन बिघडल्याने संताप व्यक्त करण्यात आला.सर्वच केंद्रावर अडचणतांत्रिक अडचणीमुळे देशभरातील सर्वच केंद्रावरील परीक्षा थांबल्या आहेत. परीक्षा सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पीसी पॉईंट प्लॅनेट प्लाझा परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर आयटी मॅनेजर विशाल काळे यांनी दिली.परीक्षा केंद्रावर पाच मिनिटं उशीर झाला तरी विद्यार्थांना प्रवेश नाकारला जातो. तर एक तास उशिरा परीक्षा सुरू झाली याला कोण जबाबदार आहे. उशिरा परीक्षा सुरू झाल्याने अनेक बाहेर गावावरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडले आहे. त्यांना आता गावी परतण्यासाठी आवश्यक बस मिळेल की नाही याची चिंता आहे.सुबोध धुरंदर, परीक्षार्थी 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी