शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

यूजीसी नेट ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण; एकतास उशिरा सुरू झाली परीक्षा

By उज्वल भालेकर | Updated: December 13, 2023 20:35 IST

बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला.

अमरावती : यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) ऑनलाइन परीक्षा ६ डिसेंबरपासून सुरू आहेत. बुधवारी या दुसऱ्या शिफ़्ट दरम्यान आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल एक तास परीक्षा सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला.सहायक प्राध्यापक तसेच ज्युनिअर फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकांसाठी  यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यानुसार ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत ही ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. एनटीए’च्या वेळापत्रकानुसार दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.  परंतु या ऑनलाइन परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १२ डिसेंबरला परीक्षा सुरू झाल्यानंतर दीडतासाने अचानक तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा बंद पडली होती. तर बुधवारी दुसऱ्या सत्रातील परीक्षा ही दुपारी ३ वाजता सुरू होणे अपेक्षित होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा ४ वाजता सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या अर्धातासपूर्वीच प्रवेश बंद केला होता. पाच मिनिट उशीर झाला तरीही परीक्षार्थींना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळेसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवर असलेल्या पीसी पॉईंट प्लॅनेट प्लाझा केंद्रावर  इतर जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील परीक्षार्थी हे एक तासापूर्वीच केंद्रावर पोहचले होते. परंतु परीक्षा उशीरा एक तास उशिरा सुरू झाल्याने ६ वाजता सुटणारी परीक्षा सायंकाळी ७ वाजता आटोपल्याने अनेक परीक्षार्थीच्या परतीच्या प्रवेशाचे नियोजन बिघडल्याने संताप व्यक्त करण्यात आला.सर्वच केंद्रावर अडचणतांत्रिक अडचणीमुळे देशभरातील सर्वच केंद्रावरील परीक्षा थांबल्या आहेत. परीक्षा सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पीसी पॉईंट प्लॅनेट प्लाझा परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर आयटी मॅनेजर विशाल काळे यांनी दिली.परीक्षा केंद्रावर पाच मिनिटं उशीर झाला तरी विद्यार्थांना प्रवेश नाकारला जातो. तर एक तास उशिरा परीक्षा सुरू झाली याला कोण जबाबदार आहे. उशिरा परीक्षा सुरू झाल्याने अनेक बाहेर गावावरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडले आहे. त्यांना आता गावी परतण्यासाठी आवश्यक बस मिळेल की नाही याची चिंता आहे.सुबोध धुरंदर, परीक्षार्थी 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी