शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

मेळघाटातील टंचाईग्रस्त गावे होणार टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा टँकरव्दारे करावा लागत आहे. विशेष म्हणजे ही गावे पाणीटंचाई आराखड्यात मागील कित्येक वर्षांपासून उपाययोजनांसाठी समाविष्ट असतात. परिणामी पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु अजूनही पाणीपुरवठ्याची स्थिती बदलेली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कायमस्वरूपी उपाययोजनांचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. आतापर्यंत लाखो रुपये पाण्यासारखे खर्च झाले असले तरी या गावांची पाणीटंचाई मात्र काही केल्या दूर झालेली नाही. त्यामुळे या गावांना कायमस्वरूपी पाणीटंचाईच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या गावांना टँकरमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तयार करण्याकरिता जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने संयुक्तरीत्या प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अध्यक्षांनी ३ जुलै रोजी दिले आहेत.दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा टँकरव्दारे करावा लागत आहे. विशेष म्हणजे ही गावे पाणीटंचाई आराखड्यात मागील कित्येक वर्षांपासून उपाययोजनांसाठी समाविष्ट असतात. परिणामी पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु अजूनही पाणीपुरवठ्याची स्थिती बदलेली नाही. त्यामुळे चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, सोनापूर, सोमवारखेडा, मलकापूर, तारूबांदा, धरमडोह, मनभंग, पाचडोंगरी, कोरडा, कोयलारी या गावांचा यात समावेश आहे. यामधील पाचडोंगरी व कोयलारी या दोन गावाकरिता डोमा येथून पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. कोरडा येथे अस्तित्वातील योजनेकरिता नव्याने उदभव घेऊन सदरचे काम पूर्ण करण्यात आलेले आहेत. परंतु, वीज पुरवठ्याअभावी योजना सुरू करता आली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपेद्र कोराटे यांनी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीदरम्यान सांगितले.इतर टँकरग्रस्त गावांना कायमस्वरूपी योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरठा विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे योजनेचा प्रस्ताव सादर केला आहे.- राजेंद्र सावळकर,कार्यकारी अभियंतादोन विभागांत समन्वय ठेवादरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जाणाऱ्या मेळघाटातील गावांना कायमस्वरूपी टँकरमुक्त करण्याचे दृष्टीने झेडपी पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता तयारी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी