शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील टंचाईग्रस्त गावे होणार टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा टँकरव्दारे करावा लागत आहे. विशेष म्हणजे ही गावे पाणीटंचाई आराखड्यात मागील कित्येक वर्षांपासून उपाययोजनांसाठी समाविष्ट असतात. परिणामी पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु अजूनही पाणीपुरवठ्याची स्थिती बदलेली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कायमस्वरूपी उपाययोजनांचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. आतापर्यंत लाखो रुपये पाण्यासारखे खर्च झाले असले तरी या गावांची पाणीटंचाई मात्र काही केल्या दूर झालेली नाही. त्यामुळे या गावांना कायमस्वरूपी पाणीटंचाईच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या गावांना टँकरमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तयार करण्याकरिता जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने संयुक्तरीत्या प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अध्यक्षांनी ३ जुलै रोजी दिले आहेत.दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा टँकरव्दारे करावा लागत आहे. विशेष म्हणजे ही गावे पाणीटंचाई आराखड्यात मागील कित्येक वर्षांपासून उपाययोजनांसाठी समाविष्ट असतात. परिणामी पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु अजूनही पाणीपुरवठ्याची स्थिती बदलेली नाही. त्यामुळे चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, सोनापूर, सोमवारखेडा, मलकापूर, तारूबांदा, धरमडोह, मनभंग, पाचडोंगरी, कोरडा, कोयलारी या गावांचा यात समावेश आहे. यामधील पाचडोंगरी व कोयलारी या दोन गावाकरिता डोमा येथून पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. कोरडा येथे अस्तित्वातील योजनेकरिता नव्याने उदभव घेऊन सदरचे काम पूर्ण करण्यात आलेले आहेत. परंतु, वीज पुरवठ्याअभावी योजना सुरू करता आली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपेद्र कोराटे यांनी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीदरम्यान सांगितले.इतर टँकरग्रस्त गावांना कायमस्वरूपी योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरठा विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे योजनेचा प्रस्ताव सादर केला आहे.- राजेंद्र सावळकर,कार्यकारी अभियंतादोन विभागांत समन्वय ठेवादरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जाणाऱ्या मेळघाटातील गावांना कायमस्वरूपी टँकरमुक्त करण्याचे दृष्टीने झेडपी पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता तयारी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी