शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

तालुका अट रद्द! स्वाधार योजनेत हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

By शुभांगी काळमेघ | Updated: August 20, 2025 18:51 IST

Amravati : स्वाधार योजनेत सुधारणा; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवा श्वास

अमरावती : अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील एक जाचक अट अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

२०१७ मध्ये सुरू झालेल्या स्वाधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक गरजांसाठीची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, २६ डिसेंबर २०२४ रोजी शासनाने एक अट घालून ठेवल्यामुळे अनेक ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांपुढे अडचणी उभ्या राहिल्या होत्या. त्या अटीनुसार, विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकतो, त्या तालुक्याचा तो रहिवासी नसावा, असे बंधन घालण्यात आले होते.

ही अट अन्यायकारक ठरत असल्याचे दाखवत कायद्याचा विद्यार्थी आणि समाजसेवक नितीन जामनिक यांनी समाज कल्याण आयुक्तालय, मंत्रालय, सचिव आणि मंत्र्यांकडे सातत्याने निवेदने व पुरावे सादर केले. या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने १३ ऑगस्ट २०२५ रोजी सुधारित निर्णय जाहीर केला. त्यानुसार, तालुका आधारित अट रद्द करून आता फक्त "शहरातील रहिवासी नसावा" हीच अट कायम ठेवण्यात आली आहे.

या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांवरील अन्याय संपुष्टात आला असून, राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAmravatiअमरावती