शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जंगल संरक्षणार्थ शस्त्रे बाहेर काढा!, एपीसीसीएफचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:50 IST

राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे

गणेश वासनिक अमरावती : राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वनविभागात आय.एफ.एस. अधिकाºयांना रिव्हॉल्व्हरचे काम काय, असा प्रश्न यादव यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.अनेक वर्षांपासून वनक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारी अतिक्रमण आणि सागवान तस्करांनी रान माजविले आहे. शस्त्रास्त्र असलेले शिकारी नेहमीच वनाधिका-यांवर हावी होत असल्याने वनविभागातील वनरक्षकांना टप्प्या-टप्प्याने एसएलआर रायफल आणि संवेदनशील क्षेत्रात काम करणाºया वनपालांना पीएसआयपदांच्या धर्तीवर रिव्हॉल्व्हर दिली आहे. प्रादेशिक आणि वन्यजीव विभागातील आरएफओंना सरसकट ९ एमएम रिव्हॉल्व्हर देण्यात आली आहे. मात्र, यातील बहुतांश शस्त्र हे गरज नसताना आणि जंगल संरक्षणात त्याचा कोणताही फायदा नसताना उपवनसंरक्षक आणि सहायक वनसंरक्षक वर्ग- १ च्या वनाधिका-यांना वाटप केले आहे. ही पदे जिल्हा किंवा तालुका पातळीवरचे असल्याने त्यांना जंगल संरक्षणाच्या नावाखाली रिव्हॉल्व्हर देण्यात आली. आयएफएस अधिका-यांनी १०५ च्यावर रिव्हॉल्व्हर स्वत:कडे अडवून ठेवल्या. मात्र, या सर्व रिव्हॉल्व्हर काढून वनपालांना देण्याचे धाडस अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (संरक्षण) करावे, अशी मागणी होत आहे.

सरसकट रिव्हॉल्व्हर का नाही?राज्यात वनपालांची संख्या तीन हजार असून, १४०० वनपाल प्रादेशिक व वन्यजीव विभागात वर्तुळ अधिकारी म्हणून कार्य करतात. अशावेळी पीएसआय या समकक्ष पदानुसार त्यांना सरसकट जंगल संरक्षणाकरिता रिव्हॉल्व्हर, तर वनरक्षकांना एसएलआर रायफल देणे गरजेचे आहे. मात्र, अतिसंवेदनशील भागात कर्तव्यावर असलेल्या वनपालांना रिव्हॉल्व्हर दिलेले आहेत. व्याघ्र प्रकल्पात अशी शस्त्रे अद्यापही देण्यात आलेली नाही.

केवळ ७२० रिव्हॉल्व्हरराज्यातील वनविभागाचा डोलारा मोठा असून, वनपाल, वनक्षेत्रपाल यांना आतापर्यंत ७२० एवढ्याच रिव्हॉल्व्हरचा पुरवठा करण्यात आला. यातील १०५ रिव्हॉल्व्हर आयएफएस लॉबीने स्वत:जवळ ठेवल्या आहेत. या रिव्हॉल्व्हर वनपालांना दिल्यास जंगल संरक्षणाकरिता त्याचा उपयोग होईल. कारण आयएफएस अधिका-यांची शस्त्रे ही त्यांच्या बंगल्याच्या कपाटात धूळखात पडली आहे. 

वर्दी नसणा-यांना शस्त्र कशासाठी?वनविभागात क्षेत्रीय अधिका-यांना वर्दी आहे. वर्ग १ च्या अधिकाºयांना वर्दी देण्यात आली नाही. जंगल संरक्षणार्थ महत्त्वाची भूमिका क्षेत्रीय वनाधिकारी बजावतात. त्यांना शस्त्रपुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, दैनंदिन व्यवहारात जंगल संरक्षणात थेट सहभाग नसणाºया आणि वर्दी नसणा-या आयएफएस वनाधिकाºयांना रिव्हॉल्व्हर कशाकरिता दिल्यात? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (संरक्षण) आर. एस. यादव यांनी जंगल संरक्षणार्थ शस्त्र बाहेर काढा धूळखात ठेवू नये, अशी तंबी राज्यातील सर्व मुख्यवनसंरक्षकांना दिली आहे.