शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जंगल संरक्षणार्थ शस्त्रे बाहेर काढा!, एपीसीसीएफचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:50 IST

राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे

गणेश वासनिक अमरावती : राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वनविभागात आय.एफ.एस. अधिकाºयांना रिव्हॉल्व्हरचे काम काय, असा प्रश्न यादव यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.अनेक वर्षांपासून वनक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारी अतिक्रमण आणि सागवान तस्करांनी रान माजविले आहे. शस्त्रास्त्र असलेले शिकारी नेहमीच वनाधिका-यांवर हावी होत असल्याने वनविभागातील वनरक्षकांना टप्प्या-टप्प्याने एसएलआर रायफल आणि संवेदनशील क्षेत्रात काम करणाºया वनपालांना पीएसआयपदांच्या धर्तीवर रिव्हॉल्व्हर दिली आहे. प्रादेशिक आणि वन्यजीव विभागातील आरएफओंना सरसकट ९ एमएम रिव्हॉल्व्हर देण्यात आली आहे. मात्र, यातील बहुतांश शस्त्र हे गरज नसताना आणि जंगल संरक्षणात त्याचा कोणताही फायदा नसताना उपवनसंरक्षक आणि सहायक वनसंरक्षक वर्ग- १ च्या वनाधिका-यांना वाटप केले आहे. ही पदे जिल्हा किंवा तालुका पातळीवरचे असल्याने त्यांना जंगल संरक्षणाच्या नावाखाली रिव्हॉल्व्हर देण्यात आली. आयएफएस अधिका-यांनी १०५ च्यावर रिव्हॉल्व्हर स्वत:कडे अडवून ठेवल्या. मात्र, या सर्व रिव्हॉल्व्हर काढून वनपालांना देण्याचे धाडस अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (संरक्षण) करावे, अशी मागणी होत आहे.

सरसकट रिव्हॉल्व्हर का नाही?राज्यात वनपालांची संख्या तीन हजार असून, १४०० वनपाल प्रादेशिक व वन्यजीव विभागात वर्तुळ अधिकारी म्हणून कार्य करतात. अशावेळी पीएसआय या समकक्ष पदानुसार त्यांना सरसकट जंगल संरक्षणाकरिता रिव्हॉल्व्हर, तर वनरक्षकांना एसएलआर रायफल देणे गरजेचे आहे. मात्र, अतिसंवेदनशील भागात कर्तव्यावर असलेल्या वनपालांना रिव्हॉल्व्हर दिलेले आहेत. व्याघ्र प्रकल्पात अशी शस्त्रे अद्यापही देण्यात आलेली नाही.

केवळ ७२० रिव्हॉल्व्हरराज्यातील वनविभागाचा डोलारा मोठा असून, वनपाल, वनक्षेत्रपाल यांना आतापर्यंत ७२० एवढ्याच रिव्हॉल्व्हरचा पुरवठा करण्यात आला. यातील १०५ रिव्हॉल्व्हर आयएफएस लॉबीने स्वत:जवळ ठेवल्या आहेत. या रिव्हॉल्व्हर वनपालांना दिल्यास जंगल संरक्षणाकरिता त्याचा उपयोग होईल. कारण आयएफएस अधिका-यांची शस्त्रे ही त्यांच्या बंगल्याच्या कपाटात धूळखात पडली आहे. 

वर्दी नसणा-यांना शस्त्र कशासाठी?वनविभागात क्षेत्रीय अधिका-यांना वर्दी आहे. वर्ग १ च्या अधिकाºयांना वर्दी देण्यात आली नाही. जंगल संरक्षणार्थ महत्त्वाची भूमिका क्षेत्रीय वनाधिकारी बजावतात. त्यांना शस्त्रपुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, दैनंदिन व्यवहारात जंगल संरक्षणात थेट सहभाग नसणाºया आणि वर्दी नसणा-या आयएफएस वनाधिकाºयांना रिव्हॉल्व्हर कशाकरिता दिल्यात? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (संरक्षण) आर. एस. यादव यांनी जंगल संरक्षणार्थ शस्त्र बाहेर काढा धूळखात ठेवू नये, अशी तंबी राज्यातील सर्व मुख्यवनसंरक्षकांना दिली आहे.